शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या कार्यामध्ये देशभरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 22:54 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आलेल्या प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारभर चाललेल्या या बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देप्रांत प्रचारकांच्या बैठकीत संघ कार्यविस्तारावर मंथनअ.भा.प्रतिनिधी सभा उद्यापासून पदाधिकारी, स्वयंसेवकांची चोख व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आलेल्या प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारभर चाललेल्या या बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशभरातून जवळपास सर्व निमंत्रित प्रतिनिधी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले असून त्यांची परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.दरवर्षी संघाची प्रतिनिधी सभा होत असते. परंतु तीन वर्षांनी ही सभा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होत असते. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाऱ्या  अखिल भारतीय सभेत संघाच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या  सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सभेत मांडण्यात येणाºया प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. याचप्रमाणे विविध संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील.अ.भा.प्रतिनिधी सभेसाठी सोमवारपासूनच बैठका सुरू झाल्या. बुधवारी प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेपाच नंतर संपली. या बैठकीला सरसंघचालकांसोबतच सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, इंद्रेश कुमार प्रामुख्याने सहभागी झाले होते. मागील तीन वर्षांतील संघविस्तार कार्याचा आढावा यात मांडण्यात आला. सोबतच भविष्यातील कार्यविस्तार उपक्रमांवरदेखील चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१८ टक्क्यांनी वाढल्या शाखा

सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मागील तीन वर्षात संघ विस्ताराच्या मुद्यांचा आढावा मांडण्यात आला. २०१५ ते २०१८ या कालावधीत संघाच्या शाखांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात दैनंदिन शाखा, साप्ताहिक मिलन व मासिक मिलन यांचा समावेश आहे.विमानतळ, रेल्वे स्थानकांवर नियोजनबद्ध स्वागतबुधवारीदेखील संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी संघभूमीत दाखल झाले. विमानतळ व रेल्वे स्थानकांवर निमंत्रितांचे स्वागत करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संघाचे स्थानिक पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी देखील धावपळ करताना दिसत होते. प्रत्येक निमंत्रिताची व्यवस्था कुठल्या वाहनात करण्यात आली आहे, रेशीमबागेत त्यांची निवासव्यवस्था कशी आहे, इथपासून ते अगदी त्यांच्या नोंदणीर्पयत सर्व माहिती त्यांना देण्यात येत होती. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील कार्यालयात सभा साहित्याचे वाटप सुरू होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर