शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:42 IST

गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्यातील आकडेवारी : पीडितांना मिळाली ४९३ कोटीची भरपाई

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ पैकी २९ हजार ७०३, नाशिक जिल्ह्यात १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७, पुणे जिल्ह्यात ६५ हजार १४७ पैकी २५ हजार ७६५, रायगड जिल्ह्यात ५७ हजार ७७४ पैकी १६ हजार ९२८, जळगाव जिल्ह्यात १ लाख २१ हजार ८३९ पैकी १६ हजार ६३७, नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २०९ पैकी ६ हजार ७६९, मुंबई जिल्ह्यात २० हजार ५३५ पैकी ५ हजार ९१३, धुळे जिल्ह्यात १८ हजार ८४६ पैकी ४ हजार ८३९, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५७३ पैकी २ हजार १८३, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार ९५५ पैकी १ हजार ८३५, सांगली जिल्ह्यात २६ हजार २६२ पैकी १ हजार ७१६, भंडारा जिल्ह्यात ११ हजार २५२ पैकी १ हजार ६९१, बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ३५९ पैकी १ हजार ३८०, अहमदनगर जिल्ह्यात २२ हजार ८८२ पैकी १ हजार २५२, बिड जिल्ह्यात ६ हजार ६९१ पैकी १ हजार ७६, कोल्हापूर जिल्ह्यात ३१ हजार ४३ पैकी १ हजार ४५ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ४९१ पैकी १ हजार १० प्रकरणे निकाली निघाली. इतर जिल्ह्यात हजारापेक्षा कमी प्रकरणे निकाली निघाली.उच्च न्यायालयातील स्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपीठातील ७२९ पैकी ८१, नागपूर खंडपीठातील ४६० पैकी १७३ तर, औरंगाबाद खंडपीठातील ४३० पैकी ३५३ प्रकरणे निकाली निघाली. पीडितांना मुंबईमध्ये ४७ लाखावर, नागपूरमध्ये ७ कोटी ४८ लाखावर तर, औरंगाबादमध्ये २ कोटी ६ लाख रुपयांवर भरपाई मिळाली.

टॅग्स :Lokadalatलोकअदालतnagpurनागपूर