शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:42 IST

गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्यातील आकडेवारी : पीडितांना मिळाली ४९३ कोटीची भरपाई

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ पैकी २९ हजार ७०३, नाशिक जिल्ह्यात १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७, पुणे जिल्ह्यात ६५ हजार १४७ पैकी २५ हजार ७६५, रायगड जिल्ह्यात ५७ हजार ७७४ पैकी १६ हजार ९२८, जळगाव जिल्ह्यात १ लाख २१ हजार ८३९ पैकी १६ हजार ६३७, नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २०९ पैकी ६ हजार ७६९, मुंबई जिल्ह्यात २० हजार ५३५ पैकी ५ हजार ९१३, धुळे जिल्ह्यात १८ हजार ८४६ पैकी ४ हजार ८३९, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५७३ पैकी २ हजार १८३, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार ९५५ पैकी १ हजार ८३५, सांगली जिल्ह्यात २६ हजार २६२ पैकी १ हजार ७१६, भंडारा जिल्ह्यात ११ हजार २५२ पैकी १ हजार ६९१, बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ३५९ पैकी १ हजार ३८०, अहमदनगर जिल्ह्यात २२ हजार ८८२ पैकी १ हजार २५२, बिड जिल्ह्यात ६ हजार ६९१ पैकी १ हजार ७६, कोल्हापूर जिल्ह्यात ३१ हजार ४३ पैकी १ हजार ४५ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ४९१ पैकी १ हजार १० प्रकरणे निकाली निघाली. इतर जिल्ह्यात हजारापेक्षा कमी प्रकरणे निकाली निघाली.उच्च न्यायालयातील स्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपीठातील ७२९ पैकी ८१, नागपूर खंडपीठातील ४६० पैकी १७३ तर, औरंगाबाद खंडपीठातील ४३० पैकी ३५३ प्रकरणे निकाली निघाली. पीडितांना मुंबईमध्ये ४७ लाखावर, नागपूरमध्ये ७ कोटी ४८ लाखावर तर, औरंगाबादमध्ये २ कोटी ६ लाख रुपयांवर भरपाई मिळाली.

टॅग्स :Lokadalatलोकअदालतnagpurनागपूर