शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोक न्यायालयात दीड लाखावर प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:42 IST

गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

ठळक मुद्देराज्यातील आकडेवारी : पीडितांना मिळाली ४९३ कोटीची भरपाई

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यात १ लाख १७ हजार ४०५ दाखलपूर्व तर, ३८ हजार २८३ प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. तसेच, यातून पीडित पक्षकारांना एकूण ४९३ कोटी ७९ लाख ८६ हजार २६६ रुपयांची भरपाई मिळाली आहे. लोक न्यायालयांत एकूण ७ लाख ७७ हजार ८१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.सातारा जिल्ह्यात ८० हजार ८६७ पैकी २९ हजार ७०३, नाशिक जिल्ह्यात १ लाख २९ हजार १९३ पैकी २७ हजार ४७, पुणे जिल्ह्यात ६५ हजार १४७ पैकी २५ हजार ७६५, रायगड जिल्ह्यात ५७ हजार ७७४ पैकी १६ हजार ९२८, जळगाव जिल्ह्यात १ लाख २१ हजार ८३९ पैकी १६ हजार ६३७, नागपूर जिल्ह्यात ४४ हजार २०९ पैकी ६ हजार ७६९, मुंबई जिल्ह्यात २० हजार ५३५ पैकी ५ हजार ९१३, धुळे जिल्ह्यात १८ हजार ८४६ पैकी ४ हजार ८३९, ठाणे जिल्ह्यात २८ हजार ५७३ पैकी २ हजार १८३, यवतमाळ जिल्ह्यात ७ हजार ९५५ पैकी १ हजार ८३५, सांगली जिल्ह्यात २६ हजार २६२ पैकी १ हजार ७१६, भंडारा जिल्ह्यात ११ हजार २५२ पैकी १ हजार ६९१, बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार ३५९ पैकी १ हजार ३८०, अहमदनगर जिल्ह्यात २२ हजार ८८२ पैकी १ हजार २५२, बिड जिल्ह्यात ६ हजार ६९१ पैकी १ हजार ७६, कोल्हापूर जिल्ह्यात ३१ हजार ४३ पैकी १ हजार ४५ तर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ हजार ४९१ पैकी १ हजार १० प्रकरणे निकाली निघाली. इतर जिल्ह्यात हजारापेक्षा कमी प्रकरणे निकाली निघाली.उच्च न्यायालयातील स्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायपीठातील ७२९ पैकी ८१, नागपूर खंडपीठातील ४६० पैकी १७३ तर, औरंगाबाद खंडपीठातील ४३० पैकी ३५३ प्रकरणे निकाली निघाली. पीडितांना मुंबईमध्ये ४७ लाखावर, नागपूरमध्ये ७ कोटी ४८ लाखावर तर, औरंगाबादमध्ये २ कोटी ६ लाख रुपयांवर भरपाई मिळाली.

टॅग्स :Lokadalatलोकअदालतnagpurनागपूर