शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:17 IST

मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाला भेट, सरसंघचालकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील तीन पक्षाचे सरकार समन्वयाने निर्णय घेत नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे सत्ताधारी अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात भाजपकडून असा कुठलाही प्रयत्न सुरू नाही. हे अमर अकबर अँथोनीचे सरकार आहे व ते एकमेकांच्या वादातूनच पडेल, असे प्रतिपादन दानवे यांनी केले. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली व सरसंघचालकांशी या वेळी त्यांनी चर्चा केली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सकाळच्या सुमारास दानवे यांचे मुख्यालयात आगमन झाले. सुमारे अर्धा तास ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारावी ते जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते मंत्रालयात किती वेळेला आले? किती त्यांनी दौरे केले? किती संकटात ते समोर उभे राहिले? असे प्रश्न उपस्थित होतात. राज्याच्या विकासाचा प्रश्न असो किंवा राज्यासमोर असलेला आरक्षणाचे सामाजिक प्रश्न असो, मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी बुधवारी कोराडीतील जगदंबादेवी मंदिरालादेखील भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

टीईटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी

राज्यात विविध परीक्षांमध्ये समोर येणारे घोटाळे हे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. पेपरफुटीचे प्रकरण हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी हे केलं फक्त त्यांनाच पकडू नये तर पाठीमागून त्यांचा करविता धनी कोण आहे याची ही चौकशी झाली पाहिजे. जर आमच्या काळामध्ये एखाद्या परीक्षेत घोटाळा झाला असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

हैदराबादचे नाव बदलण्यात हरकत काय

हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगरी केले जात असेल तर त्यात कुणालाही काही हरकत असण्याचे कारण नाही. औरंगाबादचे नामांतर आता संभाजीनगर असे झाले पाहिजे. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवत शहरांची जुनी नावे बदलण्यात आली होती. आता परत जुने नाव दिले जात असेल तर त्यात काहीच गैर नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. रेल्वेचे खाजगीकरण होणार नसल्याचा दावादेखील त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी