शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:17 IST

मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाला भेट, सरसंघचालकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील तीन पक्षाचे सरकार समन्वयाने निर्णय घेत नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे सत्ताधारी अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात भाजपकडून असा कुठलाही प्रयत्न सुरू नाही. हे अमर अकबर अँथोनीचे सरकार आहे व ते एकमेकांच्या वादातूनच पडेल, असे प्रतिपादन दानवे यांनी केले. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली व सरसंघचालकांशी या वेळी त्यांनी चर्चा केली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सकाळच्या सुमारास दानवे यांचे मुख्यालयात आगमन झाले. सुमारे अर्धा तास ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारावी ते जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते मंत्रालयात किती वेळेला आले? किती त्यांनी दौरे केले? किती संकटात ते समोर उभे राहिले? असे प्रश्न उपस्थित होतात. राज्याच्या विकासाचा प्रश्न असो किंवा राज्यासमोर असलेला आरक्षणाचे सामाजिक प्रश्न असो, मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी बुधवारी कोराडीतील जगदंबादेवी मंदिरालादेखील भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

टीईटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी

राज्यात विविध परीक्षांमध्ये समोर येणारे घोटाळे हे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. पेपरफुटीचे प्रकरण हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी हे केलं फक्त त्यांनाच पकडू नये तर पाठीमागून त्यांचा करविता धनी कोण आहे याची ही चौकशी झाली पाहिजे. जर आमच्या काळामध्ये एखाद्या परीक्षेत घोटाळा झाला असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

हैदराबादचे नाव बदलण्यात हरकत काय

हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगरी केले जात असेल तर त्यात कुणालाही काही हरकत असण्याचे कारण नाही. औरंगाबादचे नामांतर आता संभाजीनगर असे झाले पाहिजे. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवत शहरांची जुनी नावे बदलण्यात आली होती. आता परत जुने नाव दिले जात असेल तर त्यात काहीच गैर नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. रेल्वेचे खाजगीकरण होणार नसल्याचा दावादेखील त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी