शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
11
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
12
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
13
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
14
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
15
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
16
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
17
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
18
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
19
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
20
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...

मुख्यमंत्री मंत्रलयात किती वेळा आले? रावसाहेब दानवेंचा खोचक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 13:17 IST

मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

ठळक मुद्देसंघ मुख्यालयाला भेट, सरसंघचालकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील तीन पक्षाचे सरकार समन्वयाने निर्णय घेत नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे सत्ताधारी अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात भाजपकडून असा कुठलाही प्रयत्न सुरू नाही. हे अमर अकबर अँथोनीचे सरकार आहे व ते एकमेकांच्या वादातूनच पडेल, असे प्रतिपादन दानवे यांनी केले. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली व सरसंघचालकांशी या वेळी त्यांनी चर्चा केली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सकाळच्या सुमारास दानवे यांचे मुख्यालयात आगमन झाले. सुमारे अर्धा तास ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारावी ते जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते मंत्रालयात किती वेळेला आले? किती त्यांनी दौरे केले? किती संकटात ते समोर उभे राहिले? असे प्रश्न उपस्थित होतात. राज्याच्या विकासाचा प्रश्न असो किंवा राज्यासमोर असलेला आरक्षणाचे सामाजिक प्रश्न असो, मुख्यमंत्री कुठेही दिसले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी बुधवारी कोराडीतील जगदंबादेवी मंदिरालादेखील भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

टीईटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी

राज्यात विविध परीक्षांमध्ये समोर येणारे घोटाळे हे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. पेपरफुटीचे प्रकरण हा फार मोठा भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी हे केलं फक्त त्यांनाच पकडू नये तर पाठीमागून त्यांचा करविता धनी कोण आहे याची ही चौकशी झाली पाहिजे. जर आमच्या काळामध्ये एखाद्या परीक्षेत घोटाळा झाला असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.

हैदराबादचे नाव बदलण्यात हरकत काय

हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगरी केले जात असेल तर त्यात कुणालाही काही हरकत असण्याचे कारण नाही. औरंगाबादचे नामांतर आता संभाजीनगर असे झाले पाहिजे. हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवत शहरांची जुनी नावे बदलण्यात आली होती. आता परत जुने नाव दिले जात असेल तर त्यात काहीच गैर नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले. रेल्वेचे खाजगीकरण होणार नसल्याचा दावादेखील त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी