शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पोषण अभियानात नागपूर जिल्ह्याचे रँकिंग घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:54 IST

केंद्र् शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून नागपूर जिल्ह्यात पोषण अभियान (जनआंदोलन) राबविण्यात येत आहे. या अभियानातील निकषानुसार नागपूर जिल्ह्यात त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अभियानाच्या राज्यस्तरीय नोंदीमध्ये जिल्हा माघारल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमाकांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र् शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून नागपूर जिल्ह्यात पोषण अभियान (जनआंदोलन) राबविण्यात येत आहे. या अभियानातील निकषानुसार नागपूर जिल्ह्यात त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अभियानाच्या राज्यस्तरीय नोंदीमध्ये जिल्हा माघारल्याचे निदर्शनास आले आहे.या अभियानांतर्गत सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करायचा होता. यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासोबतच मुलांमधील खुजेपणा कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्त अल्पतेचे प्रमाण कमी करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. नागपूर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण आदी विभागांच्या समन्वयातून हे अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. पोषण अभियानांतर्गत पूरक पोषण आहाराबाबत, तसेच कुपोषण रोखण्यासाठी प्रभात फेऱ्या, पोषणासंबंधी विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची रॅली, प्रदर्शन, पोषण जागृती दिंडी, मेळावे आदी कार्यक्रम घेण्यासंदर्भात सुचविण्यात आले होते. जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत हा कार्यक्रम राबवायचा होता. कार्यक्रम घेण्यात राज्यात अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमाकांवर आहे. तर नाशिक जिल्हा दुसऱ्या व सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राज्याची उपराजधानी असलेला नागपूर जिल्हा राज्यात टॉप टेनच्या बाहेर आहे. महिला बालकल्याण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार हे अभियान राबविण्यासाठी ग्राम पातळीवर विभागाकडे टेक्निकल स्टाफ आवश्यक तितका उपलब्ध नव्हता. तसेच या अभियानाअंतर्गत घेतलेले कार्यक्रम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी ग्राम पातळीवर इंटरनेट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा यामध्ये माघारल्याचे सांगण्यात येते.

 

टॅग्स :nagpurनागपूर