शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पोषण अभियानात नागपूर जिल्ह्याचे रँकिंग घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:54 IST

केंद्र् शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून नागपूर जिल्ह्यात पोषण अभियान (जनआंदोलन) राबविण्यात येत आहे. या अभियानातील निकषानुसार नागपूर जिल्ह्यात त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अभियानाच्या राज्यस्तरीय नोंदीमध्ये जिल्हा माघारल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमाकांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र् शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून नागपूर जिल्ह्यात पोषण अभियान (जनआंदोलन) राबविण्यात येत आहे. या अभियानातील निकषानुसार नागपूर जिल्ह्यात त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे अभियानाच्या राज्यस्तरीय नोंदीमध्ये जिल्हा माघारल्याचे निदर्शनास आले आहे.या अभियानांतर्गत सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करायचा होता. यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासोबतच मुलांमधील खुजेपणा कमी करणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्त अल्पतेचे प्रमाण कमी करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. नागपूर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण आदी विभागांच्या समन्वयातून हे अभियान जिल्ह्यात राबवण्यात आले. पोषण अभियानांतर्गत पूरक पोषण आहाराबाबत, तसेच कुपोषण रोखण्यासाठी प्रभात फेऱ्या, पोषणासंबंधी विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची रॅली, प्रदर्शन, पोषण जागृती दिंडी, मेळावे आदी कार्यक्रम घेण्यासंदर्भात सुचविण्यात आले होते. जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत हा कार्यक्रम राबवायचा होता. कार्यक्रम घेण्यात राज्यात अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमाकांवर आहे. तर नाशिक जिल्हा दुसऱ्या व सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राज्याची उपराजधानी असलेला नागपूर जिल्हा राज्यात टॉप टेनच्या बाहेर आहे. महिला बालकल्याण विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार हे अभियान राबविण्यासाठी ग्राम पातळीवर विभागाकडे टेक्निकल स्टाफ आवश्यक तितका उपलब्ध नव्हता. तसेच या अभियानाअंतर्गत घेतलेले कार्यक्रम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी ग्राम पातळीवर इंटरनेट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा यामध्ये माघारल्याचे सांगण्यात येते.

 

टॅग्स :nagpurनागपूर