शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

By दयानंद पाईकराव | Updated: June 6, 2023 15:30 IST

रामदास आठवले : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात एका मंत्रीपदाची मागणी

नागपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत रिपाईच्या वतीने तीन जागांची आणि विधानसभेत १० ते १५ जागा मिळाव्यात यासाठी रिपाईचे प्रयत्न सुरु असून भाजपा नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात रिपाईला एक मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभेत रिपाईच्या महाराष्ट्रात दोन जागा निवडून आल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. त्यासाठी महाराष्ट्रात तीन जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपत आहे. परंतु संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत. इतर दोन जागा कोठून लढायचा याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या १० ते १५ जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच ते सहा खाते आहेत. त्यामुळे रिपाईला एक मंत्रीपद मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री पदाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दलित पँथर ही सामाजिक संघटना असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून दलित पँथर रिपाईची विंग म्हणून कार्य करू शकते का याचा निर्णय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनाच बहुमत मिळणार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वात एनडीएच बहुमताने सत्तेत येणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, त्यासाठी सर्व घटक पक्ष मिळून प्रयत्न करणार आहोत. विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदींना हरविणे अशक्य आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी मोदी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत राहुल गांधींनी मोदींविरोधात भूमिका मांडणे चुकीचे आहे. नवे संसद भवन मोदींनीच बांधल्यामुळे त्यांनीच त्याचे उद्घाटन करावे हा एनडीएचा निर्णय होता. ओडीशातील रेल्वे अपघातात पंतप्रधान, रेल्वे मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येत असून विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात दररोज संजय राऊत, अजित पवार ऐकमेकांवर आरोप करीत असून त्यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabhaलोकसभाBJPभाजपा