शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

By दयानंद पाईकराव | Updated: June 6, 2023 15:30 IST

रामदास आठवले : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात एका मंत्रीपदाची मागणी

नागपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत रिपाईच्या वतीने तीन जागांची आणि विधानसभेत १० ते १५ जागा मिळाव्यात यासाठी रिपाईचे प्रयत्न सुरु असून भाजपा नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात रिपाईला एक मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभेत रिपाईच्या महाराष्ट्रात दोन जागा निवडून आल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. त्यासाठी महाराष्ट्रात तीन जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपत आहे. परंतु संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत. इतर दोन जागा कोठून लढायचा याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या १० ते १५ जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच ते सहा खाते आहेत. त्यामुळे रिपाईला एक मंत्रीपद मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री पदाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दलित पँथर ही सामाजिक संघटना असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून दलित पँथर रिपाईची विंग म्हणून कार्य करू शकते का याचा निर्णय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनाच बहुमत मिळणार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वात एनडीएच बहुमताने सत्तेत येणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, त्यासाठी सर्व घटक पक्ष मिळून प्रयत्न करणार आहोत. विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदींना हरविणे अशक्य आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी मोदी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत राहुल गांधींनी मोदींविरोधात भूमिका मांडणे चुकीचे आहे. नवे संसद भवन मोदींनीच बांधल्यामुळे त्यांनीच त्याचे उद्घाटन करावे हा एनडीएचा निर्णय होता. ओडीशातील रेल्वे अपघातात पंतप्रधान, रेल्वे मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येत असून विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात दररोज संजय राऊत, अजित पवार ऐकमेकांवर आरोप करीत असून त्यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabhaलोकसभाBJPभाजपा