शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रिपाईला हव्यात लोकसभेच्या ३ अन् विधानसभेच्या १५ जागा

By दयानंद पाईकराव | Updated: June 6, 2023 15:30 IST

रामदास आठवले : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात एका मंत्रीपदाची मागणी

नागपूर : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत रिपाईच्या वतीने तीन जागांची आणि विधानसभेत १० ते १५ जागा मिळाव्यात यासाठी रिपाईचे प्रयत्न सुरु असून भाजपा नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी बोलणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारात रिपाईला एक मंत्रीपद देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभेत रिपाईच्या महाराष्ट्रात दोन जागा निवडून आल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. त्यासाठी महाराष्ट्रात तीन जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा राज्यसभेचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपत आहे. परंतु संधी मिळाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहोत. इतर दोन जागा कोठून लढायचा याचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी बोलून घेण्यात येईल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या १० ते १५ जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच ते सहा खाते आहेत. त्यामुळे रिपाईला एक मंत्रीपद मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्री पदाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दलित पँथर ही सामाजिक संघटना असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून दलित पँथर रिपाईची विंग म्हणून कार्य करू शकते का याचा निर्णय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींनाच बहुमत मिळणार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नेतृत्वात एनडीएच बहुमताने सत्तेत येणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, त्यासाठी सर्व घटक पक्ष मिळून प्रयत्न करणार आहोत. विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदींना हरविणे अशक्य आहे. सर्व सामान्यांच्या हितासाठी मोदी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत राहुल गांधींनी मोदींविरोधात भूमिका मांडणे चुकीचे आहे. नवे संसद भवन मोदींनीच बांधल्यामुळे त्यांनीच त्याचे उद्घाटन करावे हा एनडीएचा निर्णय होता. ओडीशातील रेल्वे अपघातात पंतप्रधान, रेल्वे मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येत असून विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात दररोज संजय राऊत, अजित पवार ऐकमेकांवर आरोप करीत असून त्यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबविण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabhaलोकसभाBJPभाजपा