शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरातील राम गणेश गडकरी स्मृतिस्थळे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:50 IST

‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देआज ९९ वा स्मृतिदिन स्मारक, समाधीस्थळाकडे कायम दुर्लक्षसाहित्यप्रेमींमध्ये प्रचंड खदखदनाट्यगृहाचे दिवस पालटले

बाबा टेकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : अल्प आयुष्यात अजरामर साहित्यकृतीद्वारे मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांनी सर्वोच्च असे स्थान प्राप्त केले. नाटककार, विनोदकार, कवी म्हणून त्यांनी मराठी साहित्यात छाप पाडली. सावनेरनगरीत त्यांचे काही काळ वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी याच भूमीत घेतला. ‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. केवळ स्मृतिदिनी या स्मृतिस्थळांकडे लक्ष जाते, एरवी स्मारक असो वा समाधीस्थळ की नाट्यगृह... नेहमी त्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एवढेच काय तर याच ठिकाणांच्या आड असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ही स्थिती बदलावी, अशी रास्त अपेक्षा साहित्यवर्तुळातून करण्यात येत आहे.राम गणेश गडकरी यांचे अल्प काळ सावनेरात वास्तव्य होते. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. यापैकी ‘एकच प्याला’ने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले. यासोबतच ‘वेड्यांचा बाजार’ आणि ‘भावबंधन’ हे अपूर्ण नाटकही त्यांच्या साहित्यकृतीमध्ये आहे. यातील ‘भावबंधन’ हे नाटक नंतर आचार्य अत्रे यांनी पूर्ण केले. केवळ ३४ वर्षे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी २३ जानेवारी १९१९ मध्ये अखेरचा श्वास सावनेरात घेतला. मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात घेता स्मृतिस्थळांच्या निर्मितीसाठी दरम्यानच्या काळात हालचाली झाल्या.ज्या घरात राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला, तेसुद्धा मोडकळीस आले. अखेर यासाठी साहित्यप्रेमींनी पुढाकार घेतल्याने पुरातत्त्व विभागाने ती इमारत ताब्यात घेतल्यानंतर स्थिती थोडी सुधारली. त्यांच्या नावाने नाट्यगृह बांधले. मात्र हे नाट्यगृह कधीच सुस्थितीत येऊ शकले नाही. साहित्य चोरी जाणे, खुर्च्यांची मोडतोड झालेली असे प्रकार वाढत गेले. नगर परिषदेने अखेर हालचाल केली आणि आजच्या घडीला नाट्यगृह कसेतरी उभे आहे. कधीतरी या नाट्यगृहात आता कार्यक्रमही होतात. समाधी स्थळावर तर नेहमी कुत्रे, डुकरांचा वावर असतो.राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यगृहाच्या रूपाने प्रयत्न झाला. कै. राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधून त्याचे उद्घाटन ११ डिसेंबर १९८८ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले. मात्र या नाट्यगृहाला हळूहळू अवकळा येण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे नाट्यगृह खंडार बनले. दरम्यानच्या काळात नाट्यगृहाच्या खिडक्या, दारे तर सोडाच खुर्च्या, वीज मीटर, वीज तारा, लोखंडी सळाकी आणि इतर साहित्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यामुळे तेथे केवळ अवशेष उरले होते. एवढेच काय तर याच नाट्यगृहात चोरट्यांची ‘एकच प्याला’ची मैफल भरत असत. याबाबत साहित्यप्रेमींनी पाठपुरावा केला. प्रशासनानेही हालचाली वाढविल्या आणि पाहता - पाहता नाट्यगृह सुस्थितीत आले. तेथे सध्या चौकीदार नेमणुकीस आहे. आता या नाट्यगृहात अधूनमधून कार्यक्रम होतात.

टॅग्स :literatureसाहित्य