शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरातील राम गणेश गडकरी स्मृतिस्थळे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:50 IST

‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देआज ९९ वा स्मृतिदिन स्मारक, समाधीस्थळाकडे कायम दुर्लक्षसाहित्यप्रेमींमध्ये प्रचंड खदखदनाट्यगृहाचे दिवस पालटले

बाबा टेकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : अल्प आयुष्यात अजरामर साहित्यकृतीद्वारे मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांनी सर्वोच्च असे स्थान प्राप्त केले. नाटककार, विनोदकार, कवी म्हणून त्यांनी मराठी साहित्यात छाप पाडली. सावनेरनगरीत त्यांचे काही काळ वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी याच भूमीत घेतला. ‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. केवळ स्मृतिदिनी या स्मृतिस्थळांकडे लक्ष जाते, एरवी स्मारक असो वा समाधीस्थळ की नाट्यगृह... नेहमी त्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एवढेच काय तर याच ठिकाणांच्या आड असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ही स्थिती बदलावी, अशी रास्त अपेक्षा साहित्यवर्तुळातून करण्यात येत आहे.राम गणेश गडकरी यांचे अल्प काळ सावनेरात वास्तव्य होते. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. यापैकी ‘एकच प्याला’ने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले. यासोबतच ‘वेड्यांचा बाजार’ आणि ‘भावबंधन’ हे अपूर्ण नाटकही त्यांच्या साहित्यकृतीमध्ये आहे. यातील ‘भावबंधन’ हे नाटक नंतर आचार्य अत्रे यांनी पूर्ण केले. केवळ ३४ वर्षे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी २३ जानेवारी १९१९ मध्ये अखेरचा श्वास सावनेरात घेतला. मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात घेता स्मृतिस्थळांच्या निर्मितीसाठी दरम्यानच्या काळात हालचाली झाल्या.ज्या घरात राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला, तेसुद्धा मोडकळीस आले. अखेर यासाठी साहित्यप्रेमींनी पुढाकार घेतल्याने पुरातत्त्व विभागाने ती इमारत ताब्यात घेतल्यानंतर स्थिती थोडी सुधारली. त्यांच्या नावाने नाट्यगृह बांधले. मात्र हे नाट्यगृह कधीच सुस्थितीत येऊ शकले नाही. साहित्य चोरी जाणे, खुर्च्यांची मोडतोड झालेली असे प्रकार वाढत गेले. नगर परिषदेने अखेर हालचाल केली आणि आजच्या घडीला नाट्यगृह कसेतरी उभे आहे. कधीतरी या नाट्यगृहात आता कार्यक्रमही होतात. समाधी स्थळावर तर नेहमी कुत्रे, डुकरांचा वावर असतो.राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यगृहाच्या रूपाने प्रयत्न झाला. कै. राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधून त्याचे उद्घाटन ११ डिसेंबर १९८८ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले. मात्र या नाट्यगृहाला हळूहळू अवकळा येण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे नाट्यगृह खंडार बनले. दरम्यानच्या काळात नाट्यगृहाच्या खिडक्या, दारे तर सोडाच खुर्च्या, वीज मीटर, वीज तारा, लोखंडी सळाकी आणि इतर साहित्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यामुळे तेथे केवळ अवशेष उरले होते. एवढेच काय तर याच नाट्यगृहात चोरट्यांची ‘एकच प्याला’ची मैफल भरत असत. याबाबत साहित्यप्रेमींनी पाठपुरावा केला. प्रशासनानेही हालचाली वाढविल्या आणि पाहता - पाहता नाट्यगृह सुस्थितीत आले. तेथे सध्या चौकीदार नेमणुकीस आहे. आता या नाट्यगृहात अधूनमधून कार्यक्रम होतात.

टॅग्स :literatureसाहित्य