शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरातील राम गणेश गडकरी स्मृतिस्थळे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 10:50 IST

‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देआज ९९ वा स्मृतिदिन स्मारक, समाधीस्थळाकडे कायम दुर्लक्षसाहित्यप्रेमींमध्ये प्रचंड खदखदनाट्यगृहाचे दिवस पालटले

बाबा टेकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : अल्प आयुष्यात अजरामर साहित्यकृतीद्वारे मराठी साहित्यात राम गणेश गडकरी यांनी सर्वोच्च असे स्थान प्राप्त केले. नाटककार, विनोदकार, कवी म्हणून त्यांनी मराठी साहित्यात छाप पाडली. सावनेरनगरीत त्यांचे काही काळ वास्तव्य होते आणि अखेरचा श्वासही त्यांनी याच भूमीत घेतला. ‘मराठीचे शेक्सपिअर’ म्हणून गौरव करण्यात आलेल्या राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्थळांना सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे. केवळ स्मृतिदिनी या स्मृतिस्थळांकडे लक्ष जाते, एरवी स्मारक असो वा समाधीस्थळ की नाट्यगृह... नेहमी त्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर असतो. एवढेच काय तर याच ठिकाणांच्या आड असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ही स्थिती बदलावी, अशी रास्त अपेक्षा साहित्यवर्तुळातून करण्यात येत आहे.राम गणेश गडकरी यांचे अल्प काळ सावनेरात वास्तव्य होते. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’, ‘एकच प्याला’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे. यापैकी ‘एकच प्याला’ने त्यांना वेगळ्या उंचीवर नेले. यासोबतच ‘वेड्यांचा बाजार’ आणि ‘भावबंधन’ हे अपूर्ण नाटकही त्यांच्या साहित्यकृतीमध्ये आहे. यातील ‘भावबंधन’ हे नाटक नंतर आचार्य अत्रे यांनी पूर्ण केले. केवळ ३४ वर्षे आयुष्य लाभलेल्या राम गणेश गडकरी यांनी २३ जानेवारी १९१९ मध्ये अखेरचा श्वास सावनेरात घेतला. मराठी साहित्यातील त्यांचे स्थान लक्षात घेता स्मृतिस्थळांच्या निर्मितीसाठी दरम्यानच्या काळात हालचाली झाल्या.ज्या घरात राम गणेश गडकरी यांनी अखेरचा श्वास घेतला, तेसुद्धा मोडकळीस आले. अखेर यासाठी साहित्यप्रेमींनी पुढाकार घेतल्याने पुरातत्त्व विभागाने ती इमारत ताब्यात घेतल्यानंतर स्थिती थोडी सुधारली. त्यांच्या नावाने नाट्यगृह बांधले. मात्र हे नाट्यगृह कधीच सुस्थितीत येऊ शकले नाही. साहित्य चोरी जाणे, खुर्च्यांची मोडतोड झालेली असे प्रकार वाढत गेले. नगर परिषदेने अखेर हालचाल केली आणि आजच्या घडीला नाट्यगृह कसेतरी उभे आहे. कधीतरी या नाट्यगृहात आता कार्यक्रमही होतात. समाधी स्थळावर तर नेहमी कुत्रे, डुकरांचा वावर असतो.राम गणेश गडकरी यांच्या स्मृती जपण्यासाठी नाट्यगृहाच्या रूपाने प्रयत्न झाला. कै. राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधून त्याचे उद्घाटन ११ डिसेंबर १९८८ ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले. मात्र या नाट्यगृहाला हळूहळू अवकळा येण्यास सुरुवात झाली आणि पाहता-पाहता हे नाट्यगृह खंडार बनले. दरम्यानच्या काळात नाट्यगृहाच्या खिडक्या, दारे तर सोडाच खुर्च्या, वीज मीटर, वीज तारा, लोखंडी सळाकी आणि इतर साहित्यांवर चोरट्यांनी हात साफ केला. त्यामुळे तेथे केवळ अवशेष उरले होते. एवढेच काय तर याच नाट्यगृहात चोरट्यांची ‘एकच प्याला’ची मैफल भरत असत. याबाबत साहित्यप्रेमींनी पाठपुरावा केला. प्रशासनानेही हालचाली वाढविल्या आणि पाहता - पाहता नाट्यगृह सुस्थितीत आले. तेथे सध्या चौकीदार नेमणुकीस आहे. आता या नाट्यगृहात अधूनमधून कार्यक्रम होतात.

टॅग्स :literatureसाहित्य