शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:43 IST

यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.

ठळक मुद्देरेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडले आहेत राख्यांचे पार्सल : अपुऱ्या यंत्रणेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जग कितीही ऑनलाईन झाले, तरी भारतीय सणांचे महत्त्व आजही कायम आहे. बहीण भावाचे नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण भावाला रक्षासूत्र बांधून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. बहीण देशाच्या कुठल्याही भागात असो, ती रक्षाबंधनाला भावाला रक्षासूत्र पाठवून आपल्या नात्यातील ऋणानुबंध जपते. पण बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र भावाला वेळेवर मिळत नाही. यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी मिळावी म्हणून बहीण वाटेल तो आटापिटा करून, वेळेत राखी खरेदी करून पोस्टाने पाठविते. आजही डाक विभाग आणि राखी हे ऋणानुबंध अजूनही जुळून आहे. त्यामुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये राखीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात राख्या देशभरातून येतात. सूत्रांच्या मते, या काळात किमान १५ ते २० हजार राखी दररोज येथे येतात. जिल्हा, तालुका, गाव यानुसार राख्यांचे सॉर्टिंग करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरील रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयातून संपूर्ण विदर्भासह बुलडाणा, जळगावपर्यंत राख्या पाठविल्या जातात. देशभरातून रेल्वेच्या पार्सलने आलेल्या राख्यांचे विभाजन करण्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे, त्याचे विभाजन आणि संबंधित डाक कार्यालयाला वेळेत वितरित होऊ शकत नाही. अपुऱ्याकर्मचाऱ्यांमुळे रेल्वेच्या पार्सल विभागात राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. सूत्रांच्या मते, रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये सॉर्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. राखीसारख्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात देशभरातून पार्सल येत असल्यामुळे सॉर्टिंगच्या कामासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. राख्यांचे गठ्ठे आरएमएसमध्ये पडून असल्याचे दिसले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचे फोटो काढण्यास मनाई केली.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडून असलेल्या गठ्ठ्यावरून असे निदर्शनास येते की, यंदाही भावांना रक्षाबंधनाला रक्षासूत्राची प्रतीक्षा करावी लागणार आहे.कुठलेही पार्सल पेन्डिंग नाहीयासंदर्भात आरएमएसमधील एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांचे म्हणणे होते की, राख्यांचे सॉर्टिंग नियमित होत आहे. रक्षाबंधनाच्या काळात डाक सॉर्टिंग करण्यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी लावतो. दररोज आलेल्या पार्सलची सॉर्टिंग होत आहे. संबंधित पोस्टाच्या कार्यालयाकडे ती पाठविली जात आहे. कुठलेही पार्सल आमच्याकडे पेन्डिंग नाही.

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर