शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:43 IST

यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.

ठळक मुद्देरेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडले आहेत राख्यांचे पार्सल : अपुऱ्या यंत्रणेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जग कितीही ऑनलाईन झाले, तरी भारतीय सणांचे महत्त्व आजही कायम आहे. बहीण भावाचे नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण भावाला रक्षासूत्र बांधून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. बहीण देशाच्या कुठल्याही भागात असो, ती रक्षाबंधनाला भावाला रक्षासूत्र पाठवून आपल्या नात्यातील ऋणानुबंध जपते. पण बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र भावाला वेळेवर मिळत नाही. यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी मिळावी म्हणून बहीण वाटेल तो आटापिटा करून, वेळेत राखी खरेदी करून पोस्टाने पाठविते. आजही डाक विभाग आणि राखी हे ऋणानुबंध अजूनही जुळून आहे. त्यामुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये राखीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात राख्या देशभरातून येतात. सूत्रांच्या मते, या काळात किमान १५ ते २० हजार राखी दररोज येथे येतात. जिल्हा, तालुका, गाव यानुसार राख्यांचे सॉर्टिंग करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरील रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयातून संपूर्ण विदर्भासह बुलडाणा, जळगावपर्यंत राख्या पाठविल्या जातात. देशभरातून रेल्वेच्या पार्सलने आलेल्या राख्यांचे विभाजन करण्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे, त्याचे विभाजन आणि संबंधित डाक कार्यालयाला वेळेत वितरित होऊ शकत नाही. अपुऱ्याकर्मचाऱ्यांमुळे रेल्वेच्या पार्सल विभागात राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. सूत्रांच्या मते, रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये सॉर्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. राखीसारख्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात देशभरातून पार्सल येत असल्यामुळे सॉर्टिंगच्या कामासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. राख्यांचे गठ्ठे आरएमएसमध्ये पडून असल्याचे दिसले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचे फोटो काढण्यास मनाई केली.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडून असलेल्या गठ्ठ्यावरून असे निदर्शनास येते की, यंदाही भावांना रक्षाबंधनाला रक्षासूत्राची प्रतीक्षा करावी लागणार आहे.कुठलेही पार्सल पेन्डिंग नाहीयासंदर्भात आरएमएसमधील एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांचे म्हणणे होते की, राख्यांचे सॉर्टिंग नियमित होत आहे. रक्षाबंधनाच्या काळात डाक सॉर्टिंग करण्यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी लावतो. दररोज आलेल्या पार्सलची सॉर्टिंग होत आहे. संबंधित पोस्टाच्या कार्यालयाकडे ती पाठविली जात आहे. कुठलेही पार्सल आमच्याकडे पेन्डिंग नाही.

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर