शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

गंगाजमुनातील वारांगनांच्या पाठिशी आता राजे मुधोजी भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 20:55 IST

Nagpur News ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले.

ठळक मुद्देगंगा-जमुना ही कॉलगर्लची नव्हे, तर देवदासींची वस्तीवस्ती हटविण्याऐवजी सन्मानजनक व्यवस्था करा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गंगा-जमुना या वस्तीला ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. तो माहीत नसणाऱ्यांनी एकदा अभ्यासावा. ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. या महिला बाहेर जात नसून माणसे येथे येतात. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले. (Raje Mudhoji Bhosle stood up now behind Ganga-Jamuna sex workers)

विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांच्या पुढाकारात झालेल्या पत्रकार परिषदेला साहित्यिक अरुणा सबाने, क्षत्रीय महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोरसिंग बैस, कवी तन्हा नागपुरी, आम्रपाली संघटनेचे अध्यक्ष सुनील चोखारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष धनराज फुसे यांच्यासह गंगा-जमुना परिसरातील महिला उपस्थित होत्या.

राजे मुधोजी भोसले म्हणाले, एकेकाळी गावाबाहेर ही वस्ती होती. या वस्तीचा एवढा तिटकारा आहे, तर वस्तीजवळ नागरिकांनी घरे का घेतली? इ.स. १७०० पासून ही वस्ती येथे आहे. त्याचे इतिहासात पुरावे आहेत. या महिला येथेच राहतील. पटत नसेल त्यांनी या भागातून दुसरीकडे जावे. वस्तीवर आक्षेप घेणाऱ्यांनी त्यांच्या संकटकाळात कोणती मदत केली, असा प्रश्न विचारून ते म्हणाले, महिला संघटनाही त्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या न्याय्य सन्मानासाठी सोबत राहू.

अरुणा सबाने म्हणाल्या, वस्तीत ५० ते ६० वर्षांपासून अनेक महिला येथे राहतात. त्यांच्याकडे सातबारा, ओळखपत्रे आहेत. या वस्तीत यापुढे अल्पवयीन मुले, मुली नकोत, या मताशी आम्ही सहमत आहोत. या महिलाही ते मान्य करतात. पोलिसांनी अलीकडे या परिसरात हॅन्डबिल वाटले. त्यात ‘कुंटणखाना’ अशा उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा कळवळा दाखविणाऱ्यांनी आतापर्यंत काय मदत केली, असा प्रश्न त्यांनी विचारला.

ज्वाला धोटे म्हणाल्या, ही वस्ती हटविताना उपराजधानीत पोलिसांची हुकूमशाही दिसत आहे. येथील महिलांच्या पुनर्वसनासाठी आपण पालकमंत्र्यांना भेटून चर्चा केली. तोडग्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न न सुटल्यास या महिला पालकमंत्र्यांच्या दारात जाऊन जीव सोडतील, असा इशारा त्यांनी दिला.

महिलांनी मांडल्या व्यथा

पत्रकार परिषदेत वस्तीतील काही महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचे पुनर्वसन नेमके काय व कसे करणार, या वयात आणि अशा परिस्थितीत आमच्याशी कुणी लग्न करणार आहेत का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पोलिसांचा वस्तीला पहारा असून बाहेर जाऊ देत नाहीत. आज सकाळी महिला पोलिसांनी दंड्याने मारहाण केली, असा आरोपही एका तरुणीने यावेळी केला.

...

टॅग्स :Socialसामाजिक