शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 21:03 IST

कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देएक कवयित्री म्हणून पहिलीच संमेलनाध्यक्ष हा बहुमान मोलाचालिहित्या महिलांना मनातले विचार बाहेर काढण्याचे करणार आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिलासाहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. या संमेलनातून त्या आपल्या साहित्यविषयक संसाराचा वैचारिक पसारा मांडणार आहेत. विशेषत्त्वाने ओबीसी समाजातील वंचित महिलांच्या व्यथांना समाजाच्या पुढे ठेवण्याचा संकल्प विजया मारोतकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.देशात ओबीसी ही वर्गवारी सर्वात मोठी आहे. राजकीय भाषेत बोलायचे तर बहुसंख्यक आणि प्रचलित भाषेत बहुजन म्हणूया. मात्र, विभिन्न जातींमध्ये विभागलेल्या या वर्गात समन्वय नाही. प्रत्येक जातींच्या वेगळ्या संकल्पना, उच्च-निचतेच्या वेगळ्या धारणा आहेत. अशी भिन्नता असली तरी संस्कृती-परंपरा एकच आहे. ओपन आणि एससी/एसटी या दोन्ही टोकाच्या वर्गांना जोडणारा मध्यम दुवा म्हणजे ओबीसी, अशी समर्पक व्याख्या करता येईल. इतर दोन्ही वर्गाप्रमाणे ओबीसींमधील महिला परंपरेने अनेक गोष्टींपासून वंचितच राहील्या आहेत. त्या व्यथा संमेलनाध्यक्ष म्हणून व्यासपीठावर मांडण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. मुळात महिलाच तुमचा धर्म, तुमची संस्कृती, परंपरा नेटाने जपतात. तुमचे घर सांभाळतात, मुला-बाळांना संस्कार देतात आणि स्वत: मात्र कायम उपेक्षित असतात. उपेक्षेचे हे दडपण कधीच बाहेर येत नाही. या दडपणाला वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आहे आणि त्या व्यासपीठाचा योग्य उपयोग मी करणार असल्याचे मारोतकर म्हणाल्या. चांगल्या विचारांचा पगडा स्वत:च्या मनावर पडू द्या आणि त्यासाठी सतत वाचत राहा, लिहित राहा असे आवाहन करणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.हे विषय ठेवणार!ओबीसी महिलांनी मनातले दडपून न ठेवता ते बाहेर काढावे, त्यांचे लिखाण प्रकाशित व्हावे, त्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावे, इतर महिला लेखिकांसोबतच ओबीसी लेखिकांचे वाचन सर्वदूर पोहोचावे, ओबीसी महिला लेखिकांची वेगळी सूची तयार करावी, शासनाने संमेलनाला अनुदान द्यावे, ओबीसी महिला लेखिकांच्या लेखनाला ग्रंथालयात स्थान मिळावे, त्यासाठी स्वतंत्र ग्रंथालये निर्मित व्हावी, प्रकाशन व वितरणाची व्यवस्था व्हावी.. असे ठळक विषय संमेलनातून ठेवणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.एका घटनेने जन्म झाला ‘त्या’ कवितेचामाझी एक विद्यार्थीनी होती. फुलपाखराप्रमाणे सतत हसत-बागडत राहणारी. १२वीला असताना अचानक ती शांत असायची. एकदा तिला या परिवर्तनासंदर्भात एकट्यात बोलते केले. प्रेमप्रकरणात मिळालेला दगा आणि त्यातून तिच्या घरात निर्माण झालेला वादंग कळला. घरी जाऊन समजावले. आई समजली मात्र सातच दिवसात त्या पोरीने आत्महत्या केली. ती घटना आजही हेलावून सोडते आणि त्यातून ‘पोरी जरा जपून’ ही कविता जन्माला आली आणि आता ती चळवळ म्हणून उभी झाल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या. ‘कवितेच्या गावात’, ‘बाई’, ‘चिमणा-चिमणी’ हे त्यांचे काव्यमय सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सतत सुरू आहेत. यासोबतच त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, लेखसंग्रह, चरित्रलेखन, कादंबरी, इतिहास जतन, चरित्रांतून महिलांच्या व्यथा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विचार मांडले आहेत.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य