शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ओबीसी साहित्य संमेलनातून मांडणार वंचित महिलांच्या व्यथा : विजया मारोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 21:03 IST

कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिला साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देएक कवयित्री म्हणून पहिलीच संमेलनाध्यक्ष हा बहुमान मोलाचालिहित्या महिलांना मनातले विचार बाहेर काढण्याचे करणार आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कवयित्री आणि साहित्यिक म्हणून विजया मारोतकर सर्वपरिचित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या ‘ओबीसी महिलासाहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. या संमेलनातून त्या आपल्या साहित्यविषयक संसाराचा वैचारिक पसारा मांडणार आहेत. विशेषत्त्वाने ओबीसी समाजातील वंचित महिलांच्या व्यथांना समाजाच्या पुढे ठेवण्याचा संकल्प विजया मारोतकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.देशात ओबीसी ही वर्गवारी सर्वात मोठी आहे. राजकीय भाषेत बोलायचे तर बहुसंख्यक आणि प्रचलित भाषेत बहुजन म्हणूया. मात्र, विभिन्न जातींमध्ये विभागलेल्या या वर्गात समन्वय नाही. प्रत्येक जातींच्या वेगळ्या संकल्पना, उच्च-निचतेच्या वेगळ्या धारणा आहेत. अशी भिन्नता असली तरी संस्कृती-परंपरा एकच आहे. ओपन आणि एससी/एसटी या दोन्ही टोकाच्या वर्गांना जोडणारा मध्यम दुवा म्हणजे ओबीसी, अशी समर्पक व्याख्या करता येईल. इतर दोन्ही वर्गाप्रमाणे ओबीसींमधील महिला परंपरेने अनेक गोष्टींपासून वंचितच राहील्या आहेत. त्या व्यथा संमेलनाध्यक्ष म्हणून व्यासपीठावर मांडण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. मुळात महिलाच तुमचा धर्म, तुमची संस्कृती, परंपरा नेटाने जपतात. तुमचे घर सांभाळतात, मुला-बाळांना संस्कार देतात आणि स्वत: मात्र कायम उपेक्षित असतात. उपेक्षेचे हे दडपण कधीच बाहेर येत नाही. या दडपणाला वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आहे आणि त्या व्यासपीठाचा योग्य उपयोग मी करणार असल्याचे मारोतकर म्हणाल्या. चांगल्या विचारांचा पगडा स्वत:च्या मनावर पडू द्या आणि त्यासाठी सतत वाचत राहा, लिहित राहा असे आवाहन करणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.हे विषय ठेवणार!ओबीसी महिलांनी मनातले दडपून न ठेवता ते बाहेर काढावे, त्यांचे लिखाण प्रकाशित व्हावे, त्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हावे, इतर महिला लेखिकांसोबतच ओबीसी लेखिकांचे वाचन सर्वदूर पोहोचावे, ओबीसी महिला लेखिकांची वेगळी सूची तयार करावी, शासनाने संमेलनाला अनुदान द्यावे, ओबीसी महिला लेखिकांच्या लेखनाला ग्रंथालयात स्थान मिळावे, त्यासाठी स्वतंत्र ग्रंथालये निर्मित व्हावी, प्रकाशन व वितरणाची व्यवस्था व्हावी.. असे ठळक विषय संमेलनातून ठेवणार असल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या.एका घटनेने जन्म झाला ‘त्या’ कवितेचामाझी एक विद्यार्थीनी होती. फुलपाखराप्रमाणे सतत हसत-बागडत राहणारी. १२वीला असताना अचानक ती शांत असायची. एकदा तिला या परिवर्तनासंदर्भात एकट्यात बोलते केले. प्रेमप्रकरणात मिळालेला दगा आणि त्यातून तिच्या घरात निर्माण झालेला वादंग कळला. घरी जाऊन समजावले. आई समजली मात्र सातच दिवसात त्या पोरीने आत्महत्या केली. ती घटना आजही हेलावून सोडते आणि त्यातून ‘पोरी जरा जपून’ ही कविता जन्माला आली आणि आता ती चळवळ म्हणून उभी झाल्याचे विजया मारोतकर म्हणाल्या. ‘कवितेच्या गावात’, ‘बाई’, ‘चिमणा-चिमणी’ हे त्यांचे काव्यमय सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सतत सुरू आहेत. यासोबतच त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, लेखसंग्रह, चरित्रलेखन, कादंबरी, इतिहास जतन, चरित्रांतून महिलांच्या व्यथा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विचार मांडले आहेत.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीWomenमहिलाliteratureसाहित्य