शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पावसाची उसंत; धानाला फटका : रोवण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 20:54 IST

जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे.

ठळक मुद्देतूर, कपाशीचा पेरा घटला : जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात पावसाचा खंड पडला तर काही भागात तुरळक पाऊस पडला. हा पाऊस धानाच्या पेरणीसाठी पोषक नसल्याने धानाच्या रोवणीला फटका बसला आहे. आतापर्यंत नियोजित क्षेत्राच्या ६५ टक्के रोवणी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ९३ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. कोरोनाचे संक्रमण असतानाही आजवर शेतकऱ्यांच्या ९३ टक्क्यावर पेरण्या पूर्ण झाल्या. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरीपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन केले होते. सद्यस्थितीत आजवर ४ लाख ४१ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची १२१ टक्के पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर होते. पण पेरणी १०१६२० हेक्टरवर झाली आहे. तुरीचे क्षेत्र यंदा ६५ हजार हेक्टर नियोजित होते. गेल्यावर्षी तुरीची ५१३६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, यंदा त्यात घट होऊन ती ५० हजार ४३९ हेक्टर इतकीच झाली आहे. कपाशीची गेल्यावर्षी बंपर पेरणी म्हणजेच २ लाख ३५ हजार २७५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा कपाशीचे नियोजित क्षेत्र २ लाख ३५ हजार इतके असतानाही आजवर केवळ २००९३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा, भिवापूर, कुही, उमरेड या तालुक्यात धानाची लागवड होते. पावसाचाच खंड पडल्याने जिल्ह्यात धानाची केवळ ६३ हजार ६२१ हेक्टरवरच रोवणी झाली. यंदा धानाचे नियोजित क्षेत्र ९५ हजार हेक्टर इतके आहे. पऱ्हे तयार आहेत, मात्र पावसामुळे रोवणी रखडली आहे.पेंचच्या पाण्याचा फायदापावसाचा खंड पडल्यामुळे धानाची रोवणी अडचणीत आली आहे. परंतू पेंच प्रकल्पाचे पाणी धान रोवणीसाठी सोडल्यामुळे रामटेक, पारशिवनी, कामठी व मौदा या तालुक्यांना फायदा होणार आहे.मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती