शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

नागपुरात हिवाळ्याच्या दिवसात पावसाळी फिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 23:44 IST

weather changed गेल्या १२ तासांत बदललेल्या हवामानामुळे नागपूरसह विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील वातावरण बदलले. नागपुरात तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शहरात तुरळक पावसानेही हजेरी लावली. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा फिल नागपूरकरांनी अनुभवला. दिवसभर असेच वातावरण होते.

ठळक मुद्देदिवसभर ढगाळ वातावरण : तुरळक पावसाची हजेरी; सायंकाळनंतर गारठा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या १२ तासांत बदललेल्या हवामानामुळेनागपूरसह विदर्भातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील वातावरण बदलले. नागपुरात तर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान शहरात तुरळक पावसानेही हजेरी लावली. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरणाचा फिल नागपूरकरांनी अनुभवला. दिवसभर असेच वातावरण होते.

सकाळपासूनच नागपुरातील नभोमंडलात ढग दाटलेले होते. रात्री थंडीही बऱ्यापैकी पडली. सकाळी काही वेळ सूर्यदर्शन झाले; मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे शहरातील हवामानाचा एकंदर नूर पार पालटून गेला. वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरात गेल्या २४ तासांमध्ये कमाल तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपुरातील पारा दिवसभरात ०.५ अंशाने खालावला होता. हवेतील गारवा आणि ढगाळलेल्या पावसाळी वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवत होती. मागील वर्षी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात पावसाने हजेरी लावली होती. यंदा नववर्षाला पाऊस आला नसला तरी चार दिवस विलंबाने त्याने तुरळक स्वरूपात का होईना, पण हजेरी लावली. या वातावरणामुळे शहरातील आर्द्रता सकाळी ७९ टक्के होती. मात्र, सायंकाळी त्यात घट होऊन ५६ टक्के झाली.

विदर्भात सोमवारी गडचिरोलीतील पारा सर्वाधिक खालावला होता. तिथे ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर यवतमाळातील तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. अमरावतीमधील कमाल तापमानात २.३ अंशांची घट होऊन तिथे १६.४ अंश तापमान नोंदविण्यात आले. यवतमाळमध्ये १.५ अंशाने तापमान वाढून १७.५ अंशांची नोंद करण्यात आली.

नागपूर, गोंदियात दृष्यता घटली

सोमवारी सकाळी नागपूर आणि गोंदियात धुके दाटले होते. यामुळे दृष्यता घटली. १.०२ किलोमीटर दृष्यथेची नोंद या दोन्ही ठिकाणी झाली. त्या खालोखाल वर्धा आणि वाशिममध्येही धुके पसरले होते. यामुळे तिथे २.०४ किलोमीटर दृष्यतेची नोंद झाली. अकोला, अमरावती, गडचिरोली, वाशिम येथे मात्र दृष्यता चांगली होती. ४.१० किलोमीटर दृष्यतेची नोंद या ठिकाणी झाली.

हरभरा, तुरीचे नुकसान

ढगाळ वातावरण गव्हासाठी अनुकूल असले तरी याचा फटका हरभरा, तूर, भाजीपाला या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या पिकांवर कीड पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस दखलपात्र झाला नसला तरी अशा वातावरणात पाऊस पडल्यास हरभऱ्याचा खार धुतला जाऊन घाटे न भरण्याची शक्यता असते. असे झाल्यास या पिकालाही मोठा फटका बसू शकतो.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर