शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भातील पावसाळी ढग हटले, गारठा वाढला; थंडीची लाट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 20:44 IST

Nagpur News विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग वगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी, अकाेल्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर : विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागवगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे. मात्र मागील दाेन दिवसांपासून पावसाळी परिस्थितीमुळे वातावरणात जाणवत असलेला गारवा पुढे अधिक तीव्र हाेण्याची शक्यता असून, थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील २४ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झाेडपले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. त्याखालाेखाल अकाेला जिल्ह्यातही गारपिटीसह अवकाळी पावसाने कहर केला. येथे ३८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गडचिराेलीत २७ मिमी, तर बुलढाणा २३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूर शहरात १.८ मिमी पाऊस झाला.

बुधवारी आकाशातील ढग निवळायला सुरुवात झाली. चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरीचा काही भाग आणि नागपूर जिल्ह्यात उमरेड, भिवापूरचा काही परिसरावर ढगांची उपस्थिती हाेती; पण दिवसभर कुठेही पावसाची नाेंद झाली नाही. इतर सर्वत्र आकाश माेकळे झाले हाेते. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली व ते १६.८ अंश नाेंदविण्यात आले. चंद्रपूर, ब्रह्मपुरीत ५.१ अंशाच्या वाढीसह १८.४ अंश तापमान नाेंदविले गेले. इतर जिल्ह्यात तापमान कमी व्हायला लागले आहे. बुलढाण्यात सर्वात कमी १३ अंश तापमान हाेते. त्यानंतर गाेंदिया १४.२ अंश, अमरावती १४.७ अंश तापमान हाेते. गुरुवारपासून किमान तापमान आणखी खाली घसरण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. नव्या वर्षाची सुरुवात थंडीच्या लाटेने हाेण्याची शक्यता विभागाने नाेंदविली आहे.

टॅग्स :weatherहवामान