शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विदर्भात अवकाळी पाऊस; धानपिकासह हरभरा आणि तुरीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 09:38 IST

नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. 

ठळक मुद्देआणखी एक दिवस पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूरसह विदर्भाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात सोमवारी पहाटे कोसळलेल्या अवकाळी पावसाने धानपिकासह अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पहाटे अशा दोन्ही दिवशी पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात सकाळी कोसळलेल्या पावसाने काढणीला आलेल्या उच्च प्रतीच्या धानपिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सकाळी ६.३० पासून शहर व जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासूनच विदर्भात ढगाळ वातावरण आहे. रविवारी सकाळी या अवकाळी पावसाने प्रथमच हजेरी लावली होती.यवतमाळ जिल्ह्यात तासभर जोरदार पाऊस बरसला. कापूस व तूर पिकांना जोरदार फटका बसला असून दाट धुक्यामुळे हरभराही रोगराईच्या सावटात असल्याचे सांगितले जाते. गोंदियात पावसाने जोरदार हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री पावसाची एक सर येऊन गेली. मात्र नंतर पाऊस बरसला नाही. अजून एक दिवस पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

टॅग्स :Rainपाऊस