शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

नागपुरात नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केले रेन वॉटर हार्वेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 11:14 IST

यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देपाणी टंचाईने दिला धडावाडीतील लाईफस्टाईल संकुलातील नागरिकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला. वाडी परिसरातील लाईफस्टाईल टाऊनशिपमधील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टींगचा शास्त्रोक्त मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कोणताही अनुभव नसताना, त्यासाठीचे सर्व नियोजन आणि कार्यवाही नागरिकांनी स्वत: केली.वाडी परिसरातील अ‍ॅटोमिक एनर्जी डेपो रोडवर वसलेल्या लाईफस्टाईल टाऊनशिपमध्ये २२४ फ्लॅट्स आहे. यात एक हजारपेक्षा जास्त लोक निवास करतात. वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात जलाशय कोरडा झाला. पाण्याचे बोअरवेलसारखे स्रोत कोरडे पडले. त्यामुळे वाडीमध्ये पाणी खरेदी करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली होती. ही टंचाई येथील रहिवाशांना पाण्याचे महत्त्व शिकवून गेली.त्यांनी प्रशासनाला दोष देण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करण्याचा मानस बाळगला. पावसाचा प्रत्येक थेंब धरणीच्या पोटात साठवला तर पुढील वर्षी संकटकाळी त्या कोट्यवधी थेंबांचा वापर करता येईल, या विचारातून या सोसायटीतील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार अंगिकारला.

टंचाईमुळे कळले महत्त्वसोसायटीतील काही नागरिक यासाठी पुढे आले. त्यांनी इतरांची समजूत घालण्यास सुरुवात केली. एक एक करता २२४ कुटुंबांमध्ये पाणी साठवण्याची एक नवी जागृती निर्माण झाली. सोसायटीच्या तज्ज्ञ मंडळींनीच परिसराचा अभ्यास केला. पाण्याचा प्रवाह कुठून कुठे वाहतो, एका तासाच्या पावसात किती लाख लिटर पाणी वाहून जाते, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीची प्रक्रिया पार पाडली. पावसाळ्यातील चार महिन्यात नाल्यांमधून वाहून वाया जाणाऱ्या लाखो लिटर शुद्ध पाण्याची साठवणूक केली. सोसायटीच्या नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाला केवळ यावर्षी अनुभवलेली पाणी टंचाई हे एकमेव कारण असल्याचे प्रा. अश्विनी मिरजकर, समीर जाधव, उमेश कौशिक, के. डब्ल्यू. शेलारे, संजय वानखेडे, विशाल साखरे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी