शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

दाणा चक्रीवादळामुळे रेल्वेचीही दाणादाण; एकूण ५५२ रेल्वे गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:10 IST

विविध प्रांतातील प्रवाशी सेवांवर प्रतिकुल परिणाम

नरेश डोंगरे  

नागपूर - बंगालच्या खाडीत उठलेल्या 'दाना' चक्रीवादळाने ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दाणादाण उडवली आहे. त्याची झळ विविध प्रांतातील प्रवाशांनाही बसली आहे. कारण देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या एकूण ५५२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

१२० किलोमिटर पेक्षा जास्त प्रति तास वेग असलेल्या दानाचा केवळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच नव्हे तर विविध प्रांतावर प्रतिकुल परिणाम होणार आहे. कारण या चक्रीवादळाच्या भीतीमुळे साउथ ईस्ट रेल्वेने १५०, ईस्ट कोस्ट रेल्वेने १९८, ईस्टर्न रेल्वेने १९० तर साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने १४ गाड्या रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये नागपूर मार्गे रोज जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. अशात एकूण ५५२ गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे सर्वच मार्गावरील आणि बहुतांश प्रदेशातील प्रवाशांना त्याची झळ पोहचली आहे. नागपूर मार्गे हावडा, जगन्नाथ पुरी कडे धावणाऱ्या अनेक गाड्या उशिरा धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.