शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: May 30, 2025 21:21 IST

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : हजारो कोटींच्या खर्चाने महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क प्रशस्त करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुन्हा एका रेल्वे स्थानकाचे नाव आणि कोड बदलविला आहे. सोबतच राज्यातील पुन्हा दोन रेल्वे स्थानकांची नावं आणि कोड भारतीय रेल्वेच्या नकाशावर बदललेली दिसणार आहे.

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सोबतच नवीन सेकंड, थर्ड आणि फोर्थ लाईनची (ट्रॅकची) निर्मिती, त्यासाठी जागोजागी बांधण्यात आलेले ओव्हर ब्रीज आणि अंडर ब्रीज, अॅटोमेटीक सिग्नल सिस्टमसह वेगवेगळ्या नव्या सिस्टम सुरू करून एकूणच भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कला नवीन लूक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे करतानाच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील चार रेल्वे स्थानकांची नावं बदलविण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूरच्या ईतवारी रेल्वे स्थानकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक' असे करण्यात आले. आता

भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नवीन नावाला आणि कोडला मंजूरी दिली आहे. आधी या स्थानकाचे नाव उस्मानाबाद रेल्वे स्टेशन आणि कोड यूएमडी होता. तर आता रेल्वेच्या नकाशावर या स्थानकाचे नाव धाराशिव तर कोड डीआरएसव्ही राहणार आहे. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी ३१ मे च्या रात्री ११.४५ पासून तो पुढच्या पावणेदोन तासांसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) बंद केली जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावं बदलली गेली आहे. तर, अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलाच्या प्रतिक्षेत आहे. आधी झालेल्या निर्णयानुसार, अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यानगर रेल्वे स्थानक आणि औरंगाबाद स्थानकाला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक म्हणून नाव दिले जाणार आहे.अंमलबजावणीसाठी उच्चस्तरावर प्रयत्न

अहिल्यानगर हे स्थानक मध्य रेल्वेच्या तर छ. संभाजीनगर स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येते. या दोन्ही स्थानकांच्या नामांतराच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, उच्चस्तरावर तसे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.