शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: May 30, 2025 21:21 IST

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : हजारो कोटींच्या खर्चाने महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क प्रशस्त करणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुन्हा एका रेल्वे स्थानकाचे नाव आणि कोड बदलविला आहे. सोबतच राज्यातील पुन्हा दोन रेल्वे स्थानकांची नावं आणि कोड भारतीय रेल्वेच्या नकाशावर बदललेली दिसणार आहे.

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सोबतच नवीन सेकंड, थर्ड आणि फोर्थ लाईनची (ट्रॅकची) निर्मिती, त्यासाठी जागोजागी बांधण्यात आलेले ओव्हर ब्रीज आणि अंडर ब्रीज, अॅटोमेटीक सिग्नल सिस्टमसह वेगवेगळ्या नव्या सिस्टम सुरू करून एकूणच भारतीय रेल्वेच्या संपूर्ण नेटवर्कला नवीन लूक देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे करतानाच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रातील चार रेल्वे स्थानकांची नावं बदलविण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूरच्या ईतवारी रेल्वे स्थानकाचे नाव 'नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक' असे करण्यात आले. आता

भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नवीन नावाला आणि कोडला मंजूरी दिली आहे. आधी या स्थानकाचे नाव उस्मानाबाद रेल्वे स्टेशन आणि कोड यूएमडी होता. तर आता रेल्वेच्या नकाशावर या स्थानकाचे नाव धाराशिव तर कोड डीआरएसव्ही राहणार आहे. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी ३१ मे च्या रात्री ११.४५ पासून तो पुढच्या पावणेदोन तासांसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) बंद केली जाणार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील दोन रेल्वे स्थानकांची नावं बदलली गेली आहे. तर, अहमदनगर आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलाच्या प्रतिक्षेत आहे. आधी झालेल्या निर्णयानुसार, अहमदनगर रेल्वे स्थानकाला अहिल्यानगर रेल्वे स्थानक आणि औरंगाबाद स्थानकाला छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक म्हणून नाव दिले जाणार आहे.अंमलबजावणीसाठी उच्चस्तरावर प्रयत्न

अहिल्यानगर हे स्थानक मध्य रेल्वेच्या तर छ. संभाजीनगर स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येते. या दोन्ही स्थानकांच्या नामांतराच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून, उच्चस्तरावर तसे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.