शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वेचे ट्रॅफिक सुरू अन् बेड ब्लॉकही बदलला; कळंभा आमला नजिक रेल्वे पुलाचे काम यशस्वी

By नरेश डोंगरे | Updated: March 1, 2024 22:47 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळंभा नजिकच्या पुलावर आज हे काम पूर्ण करण्यात आले.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेची वाहतूक बंद न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मध्य रेल्वेतील अभियंत्यांनी क्रॅक झालेल्या रेल्वेच्या पुलावरील काँक्रिटचे आवरण (बेड ब्लॉक) यशस्वीरित्या बदललले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळंभा नजिकच्या पुलावर आज हे काम पूर्ण करण्यात आले.

गेल्या वर्षी तपासणी करताना आमला जवळच्या तिनखेडा - कळंभा जवळ असलेल्या रेल्वे पुलाला (क्रमांक ९६१/१) भेगा (क्रॅक) गेल्याचे दिसून आले होते. त्याची तातडीने गंभीर दखल घेत दुरूस्तीचे काम प्राधान्याने करण्याचा अहवाल अभियंत्यांनी वरिष्ठांकडे सादर केला. या पार्श्वभूमीवर, मुख्यालयातून संबंधित कामाची मंजूरी मिळताच ९ जानेवारीला कामाला सुरूवात करण्यात आली. काम सुरू असताना रेल्वेची वाहतूक बंद करावी लागेल, असा सर्वसाधारण विचार होता. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीन मशिनरीचा वापर करून अभियंत्यांनी वेगावर निर्बंध घालत वाहतूक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या पुलाचे काम सुरू करून पुलावरून जाताना रेल्वे गाडीचा वेग १३० ऐवजी ९० किलोमिटर ठेवण्याचे प्रत्येक लोको पायलटला निर्देश देण्यात आले. अशा प्रकारे सावधगिरीचे उपाय करून युद्धपातळीवर काम करत दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले.मध्य रेल्वेच्या नागपूर मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी आज या संबंधाने पुलाची पाहणी केली. पुलाचे काम करणारे अभियंता, अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या काैशल्याचे आज काैतुक करून काम पुलाचे पूर्ण आणि चांगले झाल्याचा निर्वाळा दिला. या कामामुळे संभाव्य धोका टळला आणि पुलाची वयोमर्यादाही वाढल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे तंत्रज्ञान ठिकठिकाणच्या पुलांच्या दुरूस्तीसाठी कामी येणार असल्याचेही अधिकारी म्हणतात.

टॅग्स :railwayरेल्वे