शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रेल्वेस्थानकांवर मिळेल रेल नीरचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:55 IST

रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : खासगी कंपन्यांचे पाणी रेल्वेस्थानकाबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.रेल्वे स्थानकावरील स्टॉल, जनआहार, फूड प्लाझा आणि पेंट्रीकार मध्ये कुठल्या प्रकारचे पाणी वापरायचे यासाठी नियमावली आहे. रेल्वे मुख्यालयाने ठरवून दिलेल्या कंपनीचेच पाणी विक्रीसाठी ठेवण्यात येत होते. त्यासाठी वाणिज्य विभागाकडून रीतसर निविदा काढली जायची. त्यानंतर संबंधित कंपनीचे पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे ज्यांना एजन्सी मिळाली त्या एजन्सी मालकांनी आपली दुकानेच बाहेर थाटली. त्यांच्या मार्फत रेल्वे स्थानकावर पाणी पुरविले जात होते. आता मध्य रेल्वे मुख्यालयाने निर्णय घेतल्याने १ फेब्रुवारीपासून नागपूर रेल्वे स्थानकात रेल नीरचे पाणी विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. नागपूर स्थानकाहून दररोज १५० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या आणि ४५ ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. येथे दिवसाला पिण्याच्या पाण्याचे सिलबंद एक हजार बॉक्सची गरज आहे. एका बॉक्समध्ये जवळपास १२ बाटल्या असतात. त्यामुळे दिवसाकाठी जवळपास १२ हजार पाण्याच्या बाटल्यांची गरज भासते तर उन्हाळ्यात ही मागणी दुप्पट होते. नागपुरातही बुटीबोरी येथे रेल नीर प्लँट सुरू होणार आहे. या प्लँटसाठी वेळ असल्यामुळे सध्या नागपूर स्थानकावर बिलासपूर येथून पाणी पुरविल्या जाणार आहे. यामुळे स्थानिक एजन्सीधारक संकटात सापडले आहेत. अनेकांनी इतर कंपन्यांच्या पाण्याचा स्टॉक करुन ठेवल्यामुळे गोडाऊनमधील स्टॉकचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरWaterपाणी