शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राहुल गांधींनी केली देशाची बदनामी - अश्विनीकुमार चौबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:57 IST

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणारच

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात केलेले वक्तव्य ही देशाची बदनामी आणि मान खाली घालवणारे आहे. त्यांना देशद्रोह्यांच्या श्रेणीत ठेवले तरी कमी होणार नाही, असे मत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी व्यक्त केले.

एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. चौबे म्हणाले, राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन इथल्या लोकशाहीवर बोलून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. याच युवराजांचे देशव्यापी अभियान 'टायटाय फिश' झाले. लोकांनी बहिष्कार टाकला. यामुळे त्यांना बाहेर जाऊन बोलावे लागले. अशा या युवराजाला भारतीय जनता कदापि सहन करणार नाही. त्यांना देशद्रोही म्हणून ओळखले जाईल.

काँग्रेसने देशाला लुटण्याचे काम केले आहे. नोटिसांचे येणे-जाणे आता सुरूच राहणार आहे. जे केले त्याचे फळ भोगावेच लागणार आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. आज ईडी, आयटी, पोलिसांच्या नावाने गळे काढून ओरड सुरू आहे. पण, ते आपले काम करीत आहे. या सर्व स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्यावर सरकारचा कुठलाही दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील ९ वर्षांपासून देशात भाजप सरकार आहे. आजवर एकाही मंत्र्यावर छोटा आरोप लावता आला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही लोकांची चळवळ होती. स्वातंत्र्यानंतर नकली काँग्रेसचे रूप धारण करून देशावर सत्ता काबीज केल्याची टीका त्यांनी केली.

१५ वर्षांवरील वाहनेही स्क्रॅप होतील

१५ वर्षे जुनी शासकीय वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून इथेनॉलचे प्रमाणही वाढविण्यात आले. १५ वर्षे जुन्या खासगी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाईल. त्यांची स्थिती योग्य नसल्यास त्याच्यावरही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी