शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Corona Virus in Nagpur; भंगार वेचणाऱ्यांनी धरली भिकेची झोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 09:57 IST

भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्दे कोरोनाची व पोलीस कारवाईच्या भीतीने काम बंदअन्नधान्यासाठी दारोदार भटकंती

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंगावर मळकट कपडे आणि पाठीवर रस्त्यावर पडलेले साहित्य गोळा करण्यासाठी झोळी, असा भंगार वेचणाऱ्यांचा पेहराव. शहरात गल्लोगल्लीत, कचराकाडीत फिरून प्लास्टिक, काचेच्या बॉटल्स, पेपर व लोखंड साहित्याचे तुकडे गोळा करणे, हे त्यांचे नित्यकर्म. मात्र कोरोनाच्या धास्तीने त्यांच्या कामावर गदा आणली आहे. भंगाराच्या भरवशावर दोन वेळची भाजी-भाकरी मिळविणाऱ्या भंगार वेचणाऱ्यांवरही चक्क भीक मागण्याची पाळी आली आहे. दिघोरी उड्डाणपुलाकडून मानेवाडा रिंग रोडकडे जाताना मोठ्या प्रमाणात असलेल्या भंगार खरेदीदारांकडे सध्या शुकशुकाट पसरला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसायही ठप्प पडला आहे. पण या परिस्थितीचा परिणाम गल्लोगल्ली भंगार वेचणाऱ्या गरीब लोकांवर पडला आहे. रिंग रोडच्या झोपडपट्ट्यांसह शताब्दी चौकासमोरच्या रहाटेनगर टोली वस्तीत या लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. सकाळी उठताच खांद्यावर मोठी झोळी टांगून यांची शहरात भटकंती सुरू होते. प्लास्टिक पन्नी, बाटल्या, भंगार वेचण्याचे काम करतात. भंगार हेच त्यांच्या उदरनिवार्हाचे साधन. असे जगताना कुणासमोर हात पसरायचे नाही, हा त्यांचा स्वाभिमान. मात्र कोरोना प्रकोपामुळे त्यांच्यावर आज हात पसरण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे भंगार खरेदीची दुकाने बंद झाली आहेत. शिवाय कचºयातून कोरोना आजार पसरतो, ही धास्ती आणि पोलीस कारवाईची भीती यामुळे त्यांनी भंगार वेचण्याचे काम बंद केले. १९ मार्चपासूनच त्यांचे हे काम बंद झाल्याचे माया नामक महिलेने सांगितले. बहुतेक पुरुष आणि स्त्रियांनाही कुठले ना कुठले व्यसन. घरी साठविलेला पैसा अडका किंवा धान्य असे काहीच नाही. त्यामुळे चक्क उपासमारीची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे या महिला आता शहरातील विविध वस्त्यांमध्ये फिरून तांदूळ आणि गहू मागण्यासाठी फिरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे या महिलांना बहुतांश लोक दारात उभेही करीत नाहीत. काही स्वयंसेवी संस्थांद्वारे अन्नदान केले जाते आणि हेच त्यांच्यासाठी आधार होत असल्याचे मायाने सांगितले. मात्र अनेकांकडून त्यांची हेटाळणी मिळत असल्याचे तिने सांगितले. मात्र, पोट भरण्यासाठी त्या प्रत्येक दारावर जाऊन आवाज देतात. त्यांचे दारोदार फिरणेही धोक्याचे आहे. त्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही अडवले नाही, असे त्यांच्यापैकी एका महिलेने सांगितले. भंगारातून मिळणारे रोख पैसे दैनंदिन व्यवहारासाठी उपयोगी पडायचे. ते मिळणे आता बंद झाले आहे. यामुळे भंगार गोळा करण्याऐवजी आता भिकेची झोळी घेऊन कोरोनाने आलेल्या परिस्थितीशी झगडत आहेत.

 अनेक कुटुंबांचे हालमायाला दोन मुले आहेत. तिच्यासोबतची मंदा तीन मुलींची आई आहे. आलेल्या परिस्थितीमुळे अनेकदा उपाशी राहण्याची पाळी येते. मुलांचेही हालहाल होत आहेत. त्यामुळे भीक मागण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी रस्त्यावर उभे असताना कुणाकडून तरी तांदूळ व इतर धान्य मिळाले. परंतु तेल, मिठासाठी पैसे हवेत. मुलाबाळांना लागणाऱ्या वस्तूंसाठी पैसे हवे म्हणून भीक मागण्याचा पर्याय निवडल्याचे त्या म्हणाल्या.

- लोक दारापुढे येऊ देत नाहीत. पूर्वी गल्ल्यात फिरताना कुणीही रोखत नव्हते. आता मात्र फिरताना दिसले की जोरात ओरडतात. कोणत्या तरी आजाराच्या (कोरोना) भीतीने लोक त्यांच्या दारापुढे गेलो की खेकसतात, पळवून लावतात; मात्र काही लोक दया करून काही खायला देतात किंवा धान्यही देतात. इतक्या वर्षात कधी अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे या महिलांनी आवर्जून सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस