शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रॅगिंगमुळे त्रस्त विद्यार्थ्याने घेतली तलावात उडी; पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 20:14 IST

Nagpur News वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने नागपुरात एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले.

नागपूर - वर्ग मित्रांकडून रॅगिंग घेतली जात असल्याने एका विद्यार्थ्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून त्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत लगेच त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.

१५ वर्षांचा हा मुलगा सुभाषनगरात राहतो. तो नववीचा विद्यार्थी आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. अन्य मुलांसारखे शान शाैकीचे जीवन जगता येत नाही म्हणून आधीच नैराश्याने घेरलेल्या या विद्यार्थ्याला त्याचे वर्गमित्र छळत होते. ‘तू शारिरिकदृष्ट्या सक्षम नाही’ असे म्हणून त्याला टोचून बोलत होते. त्याला वेगवेगळ्या शारिरिक कसरती करायला लावत होते. वर्गमित्रांच्या या छळामुळे तो कंटाळला होता. कमजोर असल्याची भावना त्याच्या मनात खोलवर रुजली. त्यामुळे त्याला नैराश्याने घेरले. या स्थितीत आत्महत्येचा विचार करून शनिवारी सकाळी तो घराबाहेर पडला. अंबाझरी तलावावर पोहचल्यानंतर त्याने पाण्यात झोकून दिले.

दरम्यान, यावेळी तलावावर अंबाझरी ठाण्याचे पोलीस शिपायी आशिष जाधव आणि महापालिका कर्मचारी प्रितेश टेंभूर्णे या दोघांनी प्रसंगावधान दाखवत लगेच तलावात उडी घेतली आणि त्याला पाण्याबाहेर काढला. प्रथमोपचार केल्यानंतर तो सुखरूप असल्याचे आशिष आणि प्रितेशच्या लक्षात आले. त्यानंतर मुलाला अंबाझरी ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार डॉ. अशोक बागुल यांनी मुलाची वास्तपुस्त केल्यानंतर त्याला आत्महत्येचे कारण विचारले. बराच वेळ अबोल राहिल्यानंतर अखेर त्याने आत्महत्येमागचे कारण सांगितले. वर्गमित्रांचे चिडविणे असह्य झाल्याचेही सांगितले. ठाणेदार बागुल यांनी त्याचे समुपदेशन करत त्याच्या वडिलांना बोलवून घेतले. त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन मुलाला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

त्याला मानसिक आधाराची गरज

वर्गमित्रांच्या चिडविण्याचा या मुलावर एवढा खोलवर प्रतिकूल परिणाम झाला आहे की त्याने ‘आज वाचविले उद्या काय’ असा प्रश्न पोलिसांना केला. त्याच्या या प्रश्नामुळे त्याला प्रभावी समुपदेशनासोबतच भक्कम मानसिक आधाराचीही गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन आठवड्यात दुसरी घटना

तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला वाचविण्याची अंबाझरीतील दोन आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आईच्या मृत्युमुळे प्रचंड अस्वस्थ असलेल्या एका तरुणाने अशाच प्रकारे तलावात उडी घेतली होती आणि अंबाझरी पोलिसांनी त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढून त्याचा जीव वाचविला होता.

 

----

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस