शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 10:31 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलवून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले. मात्र वर्ष होत असतानाही नव्या नावावर जुन्याच आजारांवरील औषधोपचार सुरू आहे.

ठळक मुद्देयोजनेचे नाव नवे उपचार जुने

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरीब रुग्णांसाठी आणखी फायद्याची व्हावी यासाठी योजनेचे नाव बदलवून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करण्यात आले. यात विमा संरक्षणाची रक्कम दोन लाख होणार होती. ११०० आजारांचा समावेश होणार होता. कर्करोग, बालकांवरील उपचार, हिप जॉर्इंट, नी रिप्लेसमेंट, सिकलसेल, अ‍ॅनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू उपचारांचा समावेश करण्यात येणार होता, मात्र वर्ष होत असतानाही नव्या नावावर जुन्याच आजारांवरील औषधोपचार सुरू आहे. गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देते कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७१ आजारांचा समावेश केला. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपयांची विमा संरक्षणाची रक्कम दिली जात होती. या योजनेची मुदत १ आॅक्टोबर २०१६ रोजी संपणार होती. तत्पूर्वी नव्या सरकारने या योजनेचे नाव बदलविण्याचा व गोरगरीब रुग्णाभिमुख ही योजना करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही केली. यात विमा संरक्षणाची रक्कम ५० हजाराने वाढवून ती दोन लाख करण्याची व जुन्या योजनेतील ज्या आजाराचे फार कमी रुग्ण आले ते कमी करून नव्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११०० आजारांचा या योजनेत समावेश होणार होता.परंतु आॅक्टोबर २०१६ पासून ते मार्च २०१७ पर्यंत जुन्याच नावाने ही योजना सुरू ठवेली. १ एप्रिल २०१७ पासून जुन्या योजनेच्या नावात बदल करून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नाव दिले. परंतु योजनेत नव्या आजारांचा समावेश व विमा संरक्षणाच्या रकमेत एक रुपयांचीही वाढ केली नाही. विशेष म्हणजे, एप्रिल २०१७ पासून ते आतापर्यंत या योजनेला पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली, परंतु नाव सोडून कुठलाही बदल झाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये रोषव्याप्त आहे.

‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’पासून रुग्ण वंचितजुन्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ‘नी रिप्लेसमेंट’ आणि ‘हिप रिप्लेसमेंट’चा समावेश नव्हता. नागपूर विभागात या शस्त्रक्रियेसाठी सिकलसेलचे २००वर रुग्ण प्रतीक्षेत होते. यासाठी त्यांनी आंदोलन केले. परिणामी, नव्या योजनेत या दोन्ही उपचारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, सिकलसेलचे रुग्ण या प्रत्यारोपणापासून अद्यापही वंचित आहेत.

लहान मुले व वयोवृद्धांनाही बसला फटकागेल्या वर्षी नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ७९० रुग्ण व १७८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर शहरात डेंग्यूचे २३० रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. याचा मोठा आर्थिक फटका रुग्णांना बसला होता. यामुळे नव्या योजनेत या दोन्ही आजारासोबतच कर्करोग, बालकांवरील व वृद्धांवरील उपचारांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जुनीच योजना सुरू असल्याने याचा फटका लहान मुले व वयोवृद्धांनाही बसला.

आश्रम शाळेतील विद्यार्थी, पत्रकारही उपेक्षितनव्या योजनेत शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब आदी घटकांचा समावेश होणार होता. परंतु नवी योजना लागूच झाली नसल्याने हेही घटक गेल्या वर्षभरापासून उपेक्षित आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य