शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अन् उपराजधानीतील त्या ‘गाई’चे क्वारंटाईन होणे टळले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:04 IST

कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील एका कुटुंबाकडे असलेली गाभण गाय क्वारंटाईन करण्यासाठी मनपाचे अधिकारी पोहचले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर चर्चा केल्यामुळे गाईवर आलेला क्वारंटाईन होण्याचा प्रसंग टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनावरांपासून कोरोना संसर्ग होण्याचा कोणताही धोका नाही, असा निर्वाळा पशुतज्ज्ञांनी दिला आहे. असे असताना कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील एका कुटुंबाकडे असलेली गाभण गाय क्वारंटाईन करण्यासाठी मनपातील अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू होता. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास मनपाचे अधिकारी या गाईला क्वारंटाईन करण्यासाठी पोहचले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर चर्चा केल्यामुळे गाईवर आलेला क्वारंटाईन होण्याचा प्रसंग टळला.सतरंजीपुरा परिसरातील एकाच कुटुंबातील २६ सदस्य क्वारंटाईन केंद्रात गेले. घरी गाभण गाय असल्याने एक सदस्य देखभाल करण्यासाठी घरी थांबला. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याने आता संसर्गाचा धोका नसताना गाईला क्वारंटाईन करण्यासाठी खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडला आहे. तसेही जनावरांना क्वारंटाईन करावयाचेच झाले तर मनपाने तशी व्यवस्थाही केलेली नाही. दुभती जनावरे वाऱ्यावर सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.लोकांच्या अडचणी वाढल्याकोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील १८०० लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याने बहुसंख्य परिसर खाली झाला आहे. काही मोजके नागरिक व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने क्वारंटाईन केंद्रातून परतलेले वास्तव्यास आहेत. या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडता येत नाही. किराणा दुकाने बंद असून दूधही मिळत नाही. यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आल्याने अडचणी वाढल्या आहेत.क्वारंटाईन केंद्रापेक्षा घरी सुरक्षितकोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरातील २६ सदस्यांना क्वारंटाईन केंद्रात पाठविले. परंतु तेथे सामूहिक शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागतो. यात एखादा बाधित असला तर इतरांना बाधा होण्याचा धोका अधिक आहे. त्यापेक्षा लोकांना घरातच क्वारंटाईन केले तर अधिक सुरक्षित राहील, असे मत सतरंजीपुरा येथील रशीद खान यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस