शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

आता वाढविली जाताहेत क्वारंटाईन केंद्र : सिम्बॉयसिस कॉलेजमध्येही केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:55 IST

कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवानाडोंगरी केंद्राचा आपात स्थितीत वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोवीड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे .याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून वाठोडा येथील सिम्बॉयसिस कॉलेज परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शहरात सर्वप्रथम आमदार निवासात क्वारंटाईन कें द्र सुरू करण्यात आले. यासाठी २१० खोल्या आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर वनामती व रविभवन येथे केंद्र सुरू करण्यात आले. संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता लोणारा येथील फार्मसी कॉलेज येथे सुद्धा संशयितांना ठेवण्यात आले. यादरम्यान वानाडोंगरी येथील विद्यार्थी वसतिगृहाला केंद्राचे स्वरूप देण्यात आले. परंतु नागरिकांचा विरोध लक्षात घेता येथे ठेवण्यात आलेल्या लोकांना शुक्रवारी दुसऱ्या केंद्रात नेण्यात आले. मात्र येथील केंद्र पूर्णपणे बंद केले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात गरज पडल्यास या केंद्रात संशयितांना ठेवले जाणार आहे. दरम्यान क्वारंटाईन केंद्रावरील वाढता भार व संशयितांची वाढती संख्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने १० हजार लोकांना क्वारंटाईन ठेवता येईल, अशी तयारी केली आहे. सध्या शहरात ७ क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात आले आहेत. गरज पडल्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व व्हीएनआयटी परिसरातही केंद्र सुरू करण्याचा विचार होऊ शकतो.हॉटेलमध्ये फक्त १५ नागरिकशहरातील १५हॉटेल चालकांनी माफक दरात संशयित लोकांना ठेवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार नॉन एसी रूम साठी ५०० रुपये, एसी रुमसाठी १ हजार रुपये दर निश्चित करण्यात आले होते. मोठ्या हॉटेलने यासाठी १५०० रुपये दर ठरविले होते .परंतु आजवर या हॉटेलमध्ये फक्त १५ जण वास्तव्यास आहेत. यातील सहा जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते घरी गेले आहेत. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू यांनी सांगितले की, परिस्थिती बघून पुढील तयारी केली जाईल. नाागरिक आल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाल कळविले आहे.केंद्रनिहाय स्थितीआमदार निवास- ३०३वनामती -९७रविभवन- ४०लोणारा -१२सिम्बॉयसिस- ७०हॉटेल -९वानाडोंगरी- १२४एकूण- ६५५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर