शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तीन लाख किमतीच्या आतील औषधांचीच खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:49 IST

औषधे खरेदी व पुरवठ्याचे अधिकार देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने तीन लाख खर्चाच्या आतील औषधांचीच खरेदी करण्याचे अजब अधिकार ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला’ (इएसआयसी) दिले आहेत. या निर्णयाने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व वॉर्डात ज्या औषधे नेहमी लागतात त्यांचा तुटवडा पडला असून रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्दे‘हाफकिन’चा अजब निर्णय : ‘इएसआयसी’ रुग्णालयात औषधांचा तुटवडा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधे खरेदी व पुरवठ्याचे अधिकार देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने तीन लाख खर्चाच्या आतील औषधांचीच खरेदी करण्याचे अजब अधिकार ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला’ (इएसआयसी) दिले आहेत. या निर्णयाने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) व वॉर्डात ज्या औषधे नेहमी लागतात त्यांचा तुटवडा पडला असून रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. परंतु शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न पडला आहे. रुग्णालात गेल्या चार महिन्यांपासून औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. सूत्रानुसार, ‘लोकमत’च्या वृत्ताला घेऊन पावसाळी अधिवेशनात कामगार आयुक्त व राज्य कामगार विमा योजनेचे संचालक यांनी ‘हाफकिन कंपनी’ला औषधे पुरवठा सुरळीत होईपर्यंत औषध खरेदीचे अधिकार देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला घेऊन हाफकिन कंपनीने ज्या औषधावर वर्षभरात तीन लाखांच्या आत खर्च होतो अशीच औषधे खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालय प्रशासनाला दिले. परंतु ‘अ‍ॅस्प्रीन’ सारख्या औषधांची खरेदीच तीन लाखांवर जात असल्याने रुग्णालय प्रशासन संकटात सापडले आहे. ही औषधे हाफकिन कंपनीच खरेदी करून पुरवठा करणार आहे. परंतु तूर्तास तरी या कंपनीकडून एकही गोळी मिळाली नसल्याची माहिती आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. औषधांच्या तुटवड्याला घेऊन रोज डॉक्टर व रुग्णांशी वाद होत आहे.२५० औषधांच्या खरेदीचे अधिकारच नाहीतप्राप्त माहितीनुसार, कामगार विमा रुग्णालयात विविध प्रकारातील साधारण ४०० औषधे लागतात. यातील तीन लाखांपेक्षा कमी खर्चाची १५० औषधे आहेत. केवळ याच औषधांच्या खरेदीचे अधिकार देण्यात आले आहे. उर्वरित २५० वर औषधे खरेदी करण्याचे अधिकार नाहीत. हाफकिन कंपनीकडून औषधे मिळत नाही. यामुळे रुग्णालय चालवायचे कसे, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.कामगार विमा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून इन्सुलिन नाही. यामुळे मधुमेहाचे गंभीर रुग्ण अडचणीत आले आहेत. येथील रुग्णांना बाहेरून इन्सुलिन घेणेही परडवणारे नसल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे, उपचारासाठी वेतनातून पैसे कापूनही औषधे दिले जात नसले तर रुग्णालय चालविताच कशाला, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा आहे. रुग्णाचा जीव गेल्यास मंत्री व आयुक्त जबाबदार राहतील का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी