शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:59 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : दोन दिवसात होणार होते पंचनामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.गेल्या महिन्यात २९ व ३० आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. महापूर आला. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. जनावरांचाही मृत्यू झाला. शेतीला फटका बसला. ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. सर्वाधिक नुकसान नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत झाले. राज्य सरकारने घर आणि जनावरांच्या नुकसानाकरता तातडीने मदतीची रक्कम दिली. या नुकसानाच्या पाहणीकरता केंद्राचे पथक ११ सप्टेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहे. या पथकात सहा अधिकाºयांचा समावेश आहे. तीन-तीन अधिकाºयांचे दोन गट करून पाच जिल्ह्यांची पाहणी करणार असल्याची चर्चा आहे. तीन दिवस हे पथक राहणार असल्याची माहिती आहे.नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. दहा दिवसाचा कालावधी होत असताना पंचनामे पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अतिशय गोपनीय पद्धतीने काम होत असून कुणीही बोलण्यास तयार नाही. पुरामुळे १५ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पथक कामठी, पारशिवनी व मौदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.विभागात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसानपुरामुळे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान भंडारा जिल्ह्यात झाले. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसान असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर