शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पंचनामे अपूर्णच, केंद्राचे पथक शुक्रवारी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:59 IST

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : दोन दिवसात होणार होते पंचनामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक शुक्रवारी येत आहे. परंतु जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे मात्र अजूनही अपूर्णच असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.गेल्या महिन्यात २९ व ३० आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. महापूर आला. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. जनावरांचाही मृत्यू झाला. शेतीला फटका बसला. ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. सर्वाधिक नुकसान नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत झाले. राज्य सरकारने घर आणि जनावरांच्या नुकसानाकरता तातडीने मदतीची रक्कम दिली. या नुकसानाच्या पाहणीकरता केंद्राचे पथक ११ सप्टेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहे. या पथकात सहा अधिकाºयांचा समावेश आहे. तीन-तीन अधिकाºयांचे दोन गट करून पाच जिल्ह्यांची पाहणी करणार असल्याची चर्चा आहे. तीन दिवस हे पथक राहणार असल्याची माहिती आहे.नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात करण्याचे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. दहा दिवसाचा कालावधी होत असताना पंचनामे पूर्ण झाले नसल्याची माहिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अतिशय गोपनीय पद्धतीने काम होत असून कुणीही बोलण्यास तयार नाही. पुरामुळे १५ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पथक कामठी, पारशिवनी व मौदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.विभागात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसानपुरामुळे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान भंडारा जिल्ह्यात झाले. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या पाच जिल्ह्यात १५ लाख हेक्टरमध्ये नुकसान असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर