शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जनतेने कौल दिला; हवी आश्वासनांची पूर्ती

By admin | Updated: May 19, 2014 00:44 IST

भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला.

 निवडणूक विश्लेषण: नागपूर श्रमिक पत्रकार भवनातील चर्चेचा सूर

 नागपूर : भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला. आता नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदी युपीए सरकारचीच आर्थिक धारणे राबविल की त्यात बदल करेल याची उत्सुकता आहे. आता त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी. मोदी सरकार लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले तरच भविष्यात जनतेचा पाठिंबा कायम राहील. अन्यथा पुढील निवडणुकीत मतदार मोदी सरकारलाही नाकारतील. असा सूर नागपूर श्रमिक पत्रकार भवनात रविवारी झालेल्या चर्चेतून पुढे आला. निवडणुकीत मोदी लहर की, काँग्रेसवर रोष यावर चर्चा करण्यात आली. लोकमान्य टिळक पत्रकार भवन, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व यूसीएन वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व अनुपम सोनी आदी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी मतदारांनी काँग्रेस नको म्हणून मतदान केलेले नाही तर मोदी सरकार हवे म्हणून मतदान केले. काँग्रेस ही निवडणूक लढलीच नाही . अरु ण फणशीकर लोकांच्या मनात काँग्रेस विषयी प्रचंड रोष होता. महायुतीला एकहाती सत्ता दिली. विदर्भातील ६२ विधानसभा क्षेत्रापैकी फक्त ३ ठिकाणी आघाडी पुढे होती. श्रीपाद अपराजित काँग्रेसला सक्षम पर्याय दिला तर चांगले परिणाम मिळतील. म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. विवेक देशपांडे काँग्रेस नेत्यांचा पूर्वीसारखा लोकाशी संपर्क राहिला नसल्याने लोकांना काँग्रेस नको होती. पर्याय म्हणून मोदींना पसंती दिली. सुधीर पाठक विजयी पक्षाचे स्वागत करण्याची परंपरा काँग्रेसने पाळली नाही. नवीन सरकारकडुन लोक ांच्या अपेक्षा आहे. १९७७ साली काँग्रेस विरोधात कौल गेला होता. परंतु ३ वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती. जयदीप हर्डीकर ही निवडणूक जातीच्या आधारावर नव्हे तर सामाजिक व आर्थिक धोरणावर लढली गेली. मागील काही वर्षात काँग्रेसच्या सामान्याशी संपर्क तुटल्याने लोकांनी काँग्रेसला नाकारले. शैलेश पांडे युपीए सरकारचा मागील १० वर्षाचा निराशाजनक क ारभार, मोदींनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. काँग्रेसने मोदीला हलक्याने घेतल्याने कौल त्यांच्या विरोधात गेला. प्रकाश दुबे मतदारात काँग्रेसविषयी रोष होता. मोदींचा सक्षम पर्याय मिळाल्याने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. श्रीनिवास खांदेवाले मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार युपीएच्याच आर्थिक धोरणाचा स्वीकार करणार असेल तर परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. मोदी मॉडेलमुळे देशातील सर्वच समस्या सुटतील, असे म्हणणे धाडसाचे होईल. गुजरात मॉडेल सर्वच राज्यात शक्य नाही. अ‍ॅड. अनिल किल्लोर भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता विदर्भासाठी चांगले दिवस आले आहे. नवीन सरकारने वेगळ्या विदर्भाचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला नाही तर भविष्यात वैदर्भीय भाजपचा मानसन्मान करणार नाही. शरद पाटील लोकांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. मोदींच्या बाजूने नाही. सामान्य माणूस आता जागृत झाला आहे. आशिष देशमुख मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला यश मिळाले. यात कार्यकर्त्यांचीही मेहनत आहे. आता पक्षाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळावे. किशोर तिवारी एनडीएकडे आर्थिक कार्यक्रम नाही. आर्थिक धोरणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. धंदा म्हणून काही लोक राजकारणात आले आहेत. अतुल लोंढे युपीए सरकार विषयी लोकांच्या मनात नाराजी होती. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. आता १० कोटी लोकांना रोजगार कसा देणार? जयप्रकाश गुप्ता काँग्रेस विरोधात मोदींची लाट निर्माण होण्याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच मोदींचे मार्के टिंग केले. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे. यातून लवकरच हा पक्ष सावरेल. (प्रतिनिधी)