शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने कौल दिला; हवी आश्वासनांची पूर्ती

By admin | Updated: May 19, 2014 00:44 IST

भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला.

 निवडणूक विश्लेषण: नागपूर श्रमिक पत्रकार भवनातील चर्चेचा सूर

 नागपूर : भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला. आता नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदी युपीए सरकारचीच आर्थिक धारणे राबविल की त्यात बदल करेल याची उत्सुकता आहे. आता त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी. मोदी सरकार लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले तरच भविष्यात जनतेचा पाठिंबा कायम राहील. अन्यथा पुढील निवडणुकीत मतदार मोदी सरकारलाही नाकारतील. असा सूर नागपूर श्रमिक पत्रकार भवनात रविवारी झालेल्या चर्चेतून पुढे आला. निवडणुकीत मोदी लहर की, काँग्रेसवर रोष यावर चर्चा करण्यात आली. लोकमान्य टिळक पत्रकार भवन, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व यूसीएन वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व अनुपम सोनी आदी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी मतदारांनी काँग्रेस नको म्हणून मतदान केलेले नाही तर मोदी सरकार हवे म्हणून मतदान केले. काँग्रेस ही निवडणूक लढलीच नाही . अरु ण फणशीकर लोकांच्या मनात काँग्रेस विषयी प्रचंड रोष होता. महायुतीला एकहाती सत्ता दिली. विदर्भातील ६२ विधानसभा क्षेत्रापैकी फक्त ३ ठिकाणी आघाडी पुढे होती. श्रीपाद अपराजित काँग्रेसला सक्षम पर्याय दिला तर चांगले परिणाम मिळतील. म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. विवेक देशपांडे काँग्रेस नेत्यांचा पूर्वीसारखा लोकाशी संपर्क राहिला नसल्याने लोकांना काँग्रेस नको होती. पर्याय म्हणून मोदींना पसंती दिली. सुधीर पाठक विजयी पक्षाचे स्वागत करण्याची परंपरा काँग्रेसने पाळली नाही. नवीन सरकारकडुन लोक ांच्या अपेक्षा आहे. १९७७ साली काँग्रेस विरोधात कौल गेला होता. परंतु ३ वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती. जयदीप हर्डीकर ही निवडणूक जातीच्या आधारावर नव्हे तर सामाजिक व आर्थिक धोरणावर लढली गेली. मागील काही वर्षात काँग्रेसच्या सामान्याशी संपर्क तुटल्याने लोकांनी काँग्रेसला नाकारले. शैलेश पांडे युपीए सरकारचा मागील १० वर्षाचा निराशाजनक क ारभार, मोदींनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. काँग्रेसने मोदीला हलक्याने घेतल्याने कौल त्यांच्या विरोधात गेला. प्रकाश दुबे मतदारात काँग्रेसविषयी रोष होता. मोदींचा सक्षम पर्याय मिळाल्याने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. श्रीनिवास खांदेवाले मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार युपीएच्याच आर्थिक धोरणाचा स्वीकार करणार असेल तर परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. मोदी मॉडेलमुळे देशातील सर्वच समस्या सुटतील, असे म्हणणे धाडसाचे होईल. गुजरात मॉडेल सर्वच राज्यात शक्य नाही. अ‍ॅड. अनिल किल्लोर भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता विदर्भासाठी चांगले दिवस आले आहे. नवीन सरकारने वेगळ्या विदर्भाचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला नाही तर भविष्यात वैदर्भीय भाजपचा मानसन्मान करणार नाही. शरद पाटील लोकांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. मोदींच्या बाजूने नाही. सामान्य माणूस आता जागृत झाला आहे. आशिष देशमुख मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला यश मिळाले. यात कार्यकर्त्यांचीही मेहनत आहे. आता पक्षाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळावे. किशोर तिवारी एनडीएकडे आर्थिक कार्यक्रम नाही. आर्थिक धोरणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. धंदा म्हणून काही लोक राजकारणात आले आहेत. अतुल लोंढे युपीए सरकार विषयी लोकांच्या मनात नाराजी होती. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. आता १० कोटी लोकांना रोजगार कसा देणार? जयप्रकाश गुप्ता काँग्रेस विरोधात मोदींची लाट निर्माण होण्याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच मोदींचे मार्के टिंग केले. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे. यातून लवकरच हा पक्ष सावरेल. (प्रतिनिधी)