शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जनतेने कौल दिला; हवी आश्वासनांची पूर्ती

By admin | Updated: May 19, 2014 00:44 IST

भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला.

 निवडणूक विश्लेषण: नागपूर श्रमिक पत्रकार भवनातील चर्चेचा सूर

 नागपूर : भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारी यामुळे सामान्यांचा काँग्रेसवर रोष होता. निवडणुकीतून तो व्यक्त केला. लोकांनी पर्याय म्हणून नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला. आता नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोदी युपीए सरकारचीच आर्थिक धारणे राबविल की त्यात बदल करेल याची उत्सुकता आहे. आता त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावी. मोदी सरकार लोकांच्या विश्वासाला पात्र ठरले तरच भविष्यात जनतेचा पाठिंबा कायम राहील. अन्यथा पुढील निवडणुकीत मतदार मोदी सरकारलाही नाकारतील. असा सूर नागपूर श्रमिक पत्रकार भवनात रविवारी झालेल्या चर्चेतून पुढे आला. निवडणुकीत मोदी लहर की, काँग्रेसवर रोष यावर चर्चा करण्यात आली. लोकमान्य टिळक पत्रकार भवन, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व यूसीएन वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, प्रदीप मैत्र, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व अनुपम सोनी आदी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी मतदारांनी काँग्रेस नको म्हणून मतदान केलेले नाही तर मोदी सरकार हवे म्हणून मतदान केले. काँग्रेस ही निवडणूक लढलीच नाही . अरु ण फणशीकर लोकांच्या मनात काँग्रेस विषयी प्रचंड रोष होता. महायुतीला एकहाती सत्ता दिली. विदर्भातील ६२ विधानसभा क्षेत्रापैकी फक्त ३ ठिकाणी आघाडी पुढे होती. श्रीपाद अपराजित काँग्रेसला सक्षम पर्याय दिला तर चांगले परिणाम मिळतील. म्हणून मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. विवेक देशपांडे काँग्रेस नेत्यांचा पूर्वीसारखा लोकाशी संपर्क राहिला नसल्याने लोकांना काँग्रेस नको होती. पर्याय म्हणून मोदींना पसंती दिली. सुधीर पाठक विजयी पक्षाचे स्वागत करण्याची परंपरा काँग्रेसने पाळली नाही. नवीन सरकारकडुन लोक ांच्या अपेक्षा आहे. १९७७ साली काँग्रेस विरोधात कौल गेला होता. परंतु ३ वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती. जयदीप हर्डीकर ही निवडणूक जातीच्या आधारावर नव्हे तर सामाजिक व आर्थिक धोरणावर लढली गेली. मागील काही वर्षात काँग्रेसच्या सामान्याशी संपर्क तुटल्याने लोकांनी काँग्रेसला नाकारले. शैलेश पांडे युपीए सरकारचा मागील १० वर्षाचा निराशाजनक क ारभार, मोदींनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली होती. काँग्रेसने मोदीला हलक्याने घेतल्याने कौल त्यांच्या विरोधात गेला. प्रकाश दुबे मतदारात काँग्रेसविषयी रोष होता. मोदींचा सक्षम पर्याय मिळाल्याने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. श्रीनिवास खांदेवाले मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार युपीएच्याच आर्थिक धोरणाचा स्वीकार करणार असेल तर परिस्थितीत फारसा बदल होणार नाही. मोदी मॉडेलमुळे देशातील सर्वच समस्या सुटतील, असे म्हणणे धाडसाचे होईल. गुजरात मॉडेल सर्वच राज्यात शक्य नाही. अ‍ॅड. अनिल किल्लोर भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता विदर्भासाठी चांगले दिवस आले आहे. नवीन सरकारने वेगळ्या विदर्भाचा निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला नाही तर भविष्यात वैदर्भीय भाजपचा मानसन्मान करणार नाही. शरद पाटील लोकांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. मोदींच्या बाजूने नाही. सामान्य माणूस आता जागृत झाला आहे. आशिष देशमुख मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला यश मिळाले. यात कार्यकर्त्यांचीही मेहनत आहे. आता पक्षाने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळावे. किशोर तिवारी एनडीएकडे आर्थिक कार्यक्रम नाही. आर्थिक धोरणाशिवाय परिवर्तन शक्य नाही. धंदा म्हणून काही लोक राजकारणात आले आहेत. अतुल लोंढे युपीए सरकार विषयी लोकांच्या मनात नाराजी होती. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. आता १० कोटी लोकांना रोजगार कसा देणार? जयप्रकाश गुप्ता काँग्रेस विरोधात मोदींची लाट निर्माण होण्याला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच मोदींचे मार्के टिंग केले. काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे. यातून लवकरच हा पक्ष सावरेल. (प्रतिनिधी)