शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ईव्हीएमविरोधात सोमवारी  जनआक्रोश मोर्चा

By नरेश डोंगरे | Updated: March 10, 2024 23:13 IST

स्थानिक निवडणूक आयुक्त कार्यालयावर धडकणार.

नागपूर : ईव्हीएमवर निवडणूका घेऊन देशाची फसवणूक केली जात आहे. वारंवार मागणी करूनही बॅलेटपेपरवर निवडणूका न घेता हुकुमशाही पद्धत अवलंबिण्यात येत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम या संघटनेकडून सोमवारी ११ मार्चला विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती अॅड आकाश मून यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी प्रीतम बुलकुंडे, विश्वास पाटिल, एड. स्मिता कांबले, एड. भावना जेठे, राजीव झोड़ापे, ओम सरदार उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शी होणे अत्यावश्यक आहे. एकीकडे ईव्हीएम मशिनमध्ये टेम्परिंग होते, हे मान्य केले जाते आणि दुसरीकडे बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याचे टाळून ईव्हीएमचा अट्टहास धरला जातो. हे हुकुमशाहीचे लक्षण आहे. ईव्हीएमवरून विश्वास उडाल्यामुळे देशभरातील नागरिक आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांची बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी आहे. मात्र, ती टाळली जात असल्याने ईव्हीएम विरोधात सर्वत्र निषेध आंदोलन सुरू आहे. या संबंधाने देशातील पहिली राष्ट्रीय ईव्हीएम विरोधी परिषद १७ फेब्रुवारीला नागपुरात घेण्यात आली. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम संघटनेकडून गेल्या १० दिवसांपासून संविधान चाैकात धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून त्याची दखलच घेतली गेलेली नाही. या संबंधाने आम्ही देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे तक्रार केली. ही तक्रार पोहचल्याचे चार ओळीची पोच आम्हाला मिळाली. मात्र, २० दिवस होऊनही अद्याप त्यासंबंधाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मिळाले नाही. या एकूणच पार्श्वभूमीवर, सोमवारी ११ मार्चला नागपुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात अॅड. महमूद प्राचा, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी लिलाताई चितळे, अॅड फिरदोस मिर्झा, सलिल देशमुख, अमन कांबळे, मोहम्मद आतिकसहविविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नेतृत्व करणार आहेत. नागरिकांनीही या मोर्चात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकारी अॅड प्रीतम बुलकुंडे यांनी केले.

दिल्लीलाही धडकणार मोर्चानागपूरच्या मोर्चानंतर दिल्लीतही अशा प्रकारचा मोठा मोर्चा काढून तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर नेणार आहे. याशिवाय निवडणूक बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्या, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेशिर बाजू मांडली जाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर