शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

प्रसार माध्यमांनी मानवाधिकाराची जनजागृती करावी

By admin | Updated: September 15, 2015 06:08 IST

मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार

नागपूर : मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) सिरियाक जोसेफ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज, मीडिया व मानव अधिकारांसमोरील आव्हाने : एक संवाद’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शरदचंद्र सिन्हा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मानवाधिकार आयोगाचे सहायक संचालक डॉ. सरोजकुमार शुक्ला, सहसचिव डॉ. रंजित सिंह, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको म्हणून मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये ही मानवाधिकाराची जबाबदारी आह,े असे प्रतिपादन जोसेफ यांनी केले. मानवी जीवनावर प्रसार माध्यमांचा फार मोठा प्रभाव आहे. एका अर्थाने प्रसार माध्यमं ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी समाजकार्याची भूमिका जिवंत ठेवावी, असे मत प्रा. गिरीश्वर मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजित सिंह यांनी तर आभार डॉ. अधरा देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)