शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

प्रसार माध्यमांनी मानवाधिकाराची जनजागृती करावी

By admin | Updated: September 15, 2015 06:08 IST

मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार

नागपूर : मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) सिरियाक जोसेफ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज, मीडिया व मानव अधिकारांसमोरील आव्हाने : एक संवाद’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शरदचंद्र सिन्हा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मानवाधिकार आयोगाचे सहायक संचालक डॉ. सरोजकुमार शुक्ला, सहसचिव डॉ. रंजित सिंह, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको म्हणून मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये ही मानवाधिकाराची जबाबदारी आह,े असे प्रतिपादन जोसेफ यांनी केले. मानवी जीवनावर प्रसार माध्यमांचा फार मोठा प्रभाव आहे. एका अर्थाने प्रसार माध्यमं ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी समाजकार्याची भूमिका जिवंत ठेवावी, असे मत प्रा. गिरीश्वर मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजित सिंह यांनी तर आभार डॉ. अधरा देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)