शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

प्रसार माध्यमांनी मानवाधिकाराची जनजागृती करावी

By admin | Updated: September 15, 2015 06:08 IST

मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार

नागपूर : मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मानवाधिकार हक्कांची आवश्यकता आहे. यात प्रसार माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) सिरियाक जोसेफ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज, मीडिया व मानव अधिकारांसमोरील आव्हाने : एक संवाद’ या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादाचे सोमवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.विद्यापीठ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादादरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य शरदचंद्र सिन्हा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, मानवाधिकार आयोगाचे सहायक संचालक डॉ. सरोजकुमार शुक्ला, सहसचिव डॉ. रंजित सिंह, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अधरा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको म्हणून मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये ही मानवाधिकाराची जबाबदारी आह,े असे प्रतिपादन जोसेफ यांनी केले. मानवी जीवनावर प्रसार माध्यमांचा फार मोठा प्रभाव आहे. एका अर्थाने प्रसार माध्यमं ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी समाजकार्याची भूमिका जिवंत ठेवावी, असे मत प्रा. गिरीश्वर मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजित सिंह यांनी तर आभार डॉ. अधरा देशपांडे यांनी मानले.(प्रतिनिधी)