शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

ओबीसी मंत्रालयासाठी ३० हजार कोटींची तरतूद करा : बबनराव तायवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:25 IST

राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार देशात व महाराष्ट्रातओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसी समाजाकरिता विविध योजना राबविण्यासाठी २०१६ मध्ये राज्यात प्रथमच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. परंतु गेल्या तीन वर्षात या विभागासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक तरतूद केली नाही. ओबीसी मंत्रालयासाठी शासनाने ३० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे युती सरकारने ओबीसीवर अन्याय केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार देशात व महाराष्ट्रातओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के आहे. ओबीसी समाजाकरिता विविध योजना राबविण्यासाठी २०१६ मध्ये राज्यात प्रथमच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. परंतु गेल्या तीन वर्षात या विभागासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक तरतूद केली नाही. ओबीसी मंत्रालयासाठी शासनाने ३० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.१३ टक्के लोकसंख्या असलेल्या अनुसूचीत जाती करिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून १२,३०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या ७ टक्के असून आदिवासी विकास विभागासाठी १०,७०५ कोटींची तरतूद केली आहे. मात्र ३८० जातींचा समावेश व ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती ओबीसी विभागाकरिता २,८८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद तुटपुंजी असल्याने राज्य सरकारने ती ३० हजार कोटी करण्याची मागणी ओबीसी महासंघाने केली आहे. तसेच सभागृहातील ओबीसी व आमदार व मंत्र्यांनी यासाठी संघर्ष करावा, असे आवाहन महासंघाने केले आहे.३ टक्के लोकसंख्या असलेल्या धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतूद केली. त्याच धर्तीवर ओबीसीसाठी ३० हजार कोटींची तरतूद करावी. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक सत्रासाठी वसतिगृह सुरू करावे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, विधिमंडळ ओबीसी समिती गठित करावी. ओबीसी आर्थिक विकास महांमडळाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष दूर करावा, सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालये सुरू करवी, या संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा २.५० लाखापर्यंत वाढविण्यात यावी. विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रशिप योजना लागू करण्याची मागणी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, सचिन राजूकर, अशोक जिवतोडे, शरद वानखेडे, संजय पन्नासे, गंनश्वर आरीकर, शकील पटेल, रोशन कुंभलकर, नीलेश कोंढे, मयूर वाघ आदींनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेOBCअन्य मागासवर्गीय जातीfundsनिधी