शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी

By admin | Updated: July 26, 2015 03:11 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेसचा पदग्रहण सोहळानागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारसोबतच तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य संघटना, कार्पाेट्सला संयुक्त रुपाने प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.अ‍ॅकेडमी आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एएमएस) पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून एम्स. नवी दिल्लीचे पल्मोनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख व पद्मश्री डॉ. आर. गुलेरिया, मुंबईचे प्रसिद्ध इन्टरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. डी. पहलाजानी, एएमएसचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. व्ही.एम. भालेराव, डॉ. राजू खंडेलवाल, पूर्व अध्यक्ष सुनील अंबुलकर, डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. निर्मल जयस्वाल उपस्थित होते. विशेष रुपाने डॉ. बी.जे. सुभेदार कार्यक्रमात सहभागी झाले होते. फडणवीस म्हणाले, ज्या गतीने आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान व औषधे येत आहेत, त्या गतीने आरोग्य सेवा स्वस्त आणि सहज उपलब्ध झालेली नाही. भारत विकसनशिल देश आहे. यामुळे अर्थसंकल्पात कमी बजेटची तरतूद करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील इस्पितळांमध्ये मनुष्यबळांची संख्या फार कमी आहे. ही दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ५०० डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली, परंतु २०० डॉक्टरच उपलब्ध होऊ शकले. सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागात, गोरगरीब व तळागाळातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. गुलेरिया म्हणाले, रोज नवीन आषधे व तंत्रज्ञान येत आहे. यामुळे डॉक्टरांनी अपडेट राहणे आवश्यक झाले आहे. डॉ. पहलाजानी म्हणाले, नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात कार्पाेरेट इस्पितळाची संस्कृति विकसीत झालेली नाही. यासाठी येथील डॉक्टर कौतुकाचे पात्र आहेत.येथे दिल्ली, मुंबईसारखीच सेवा उपलब्ध आहे, असे म्हणून त्यांनी नव्या चमूला शुभेच्छा दिल्या. डॉ. भालेराव म्हणाले की, जग बदलत आहे,आपणासही बदलण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी वर्षभरातील प्रस्तावित कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली. संचालन डॉ. कल्पना दाते व डॉ. राजेश बारोकर यांनी केले. आभार नवनियुक्त सचिव डॉ. निर्मल जायस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)