शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 21:53 IST

Nagpur News केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला.

नागपूर : केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला. या वेळी वाढती महागाई, नोटाबंदी, महिलांवरील अत्याचार, शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत आता अग्निपथ योजनेच्या नावाखाली बेरोजगारांशी आणि देशाच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा दावा करण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चात सहभागी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवून लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आहे. तसेच ईडीचा धाक दाखवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरू आहे, असा आरोप करण्यात आला.

या मशाल मोर्चात राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे के. के. पांडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर, महासचिव संजय दुबे व तानाजी वनवे, सचिव कमलेश समर्थ व आर. एम. खान नायडू, माजी नगरसेवक प्रफुल गुडधे-पाटील, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस