शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या संरक्षणालाच सर्वात जास्त प्राधान्य : मुख्यमंत्र्यांनी मांडली भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 20:07 IST

भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेसकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा हा कधीही व कुणीच बदलवू शकत नाही. तशी तरतूदच संविधान निर्मात्यांनी केली होती. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यालाच भाजपकडून सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसने बाबासाहेबांच्या नावाचा केवळ वापर केल्याचे टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेसकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा हा कधीही व कुणीच बदलवू शकत नाही. तशी तरतूदच संविधान निर्मात्यांनी केली होती. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यालाच भाजपकडून सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, व्ही.सतीश, माजी मंत्री सत्यनारायण जटिया, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला समतेचा संदेश दिला. बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. काँग्रेस नेत्यांची कथनी व करणी यात बरेच अंतर होते. आम्ही बोलतो कमी, काम जास्त करतो. भाजपच्या १० वर्षांच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा कित्येक पटींनी जास्त काम झाले आहे. काँग्रेसने केवळ अनुसूचित जातींमधील काही लोकांनाच मोठे केले. समाज मात्र विकासापासून दूरच राहिला. संविधानाचे आम्ही रक्षणच करणार आहोत. गरीब, वंचित तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या अधिकारांसाठी संविधानात संशोधन करण्यात आले. मात्र काँग्रेस व विरोधी पक्ष अपप्रचार करत आहे. विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे. म्हणून आता ते खोटे बोलून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी लावला.काँग्रेसला बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकारच नाहीयावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकांत पराभूत केले होते. काँग्रेसने सातत्याने केवळ बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला. आम्ही मात्र बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत उभा करत आहोत. काँग्रेसच्या नेत्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा किती जास्त काम झाले याचे उत्तर मी समोरासमोर देण्यासाठी तयार आहे, असे आव्हानदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले.अन् तीन दिवसांत मिळाली इंदू मिलची जागाइंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. मात्र संपुआ व आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्मारकासाठी एक इंचही जमीन मिळाली नाही. आमचे सरकार आल्यावर मी फाईल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी यात समस्या काय आहे असे विचारले असता केंद्राकडूनच जमीन मिळत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर त्यांनी संबंधित मंत्र्यांना बोलावून तीन दिवसांत जमीन स्मारकासाठी मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले व खरोखरच पुढील तीन दिवसांत जागा मिळाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल येथे २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्णत्वास येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.जुलैमध्ये सुरू होणार लंडनमधील ‘म्युझियम’बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानी त्यांच्या आठवणींचा संग्रह करण्यात येत आहे. तेथील ‘म्युझियम’मध्ये त्यांची हस्तलिखिते, पत्र, दुर्मिळ चित्र इत्यादी असतील. जुलैमध्ये हे ‘म्युझियम’ सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा