शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

२०० महिलांना मिळाले हिंसाचारापासून संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:50 AM

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने २००५ साली स्वतंत्र अधिनियम काढले असून या अधिनियमाचा आधार घेत कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या ....

ठळक मुद्दे३४ प्रकरणे निकाली : महिला व बाल विकास विभागाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने २००५ साली स्वतंत्र अधिनियम काढले असून या अधिनियमाचा आधार घेत कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या २०० महिलांना संरक्षण प्राप्त झाले आहे.सामाजिक बदलांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर पडत चालला आहे. दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांची मोठ्या प्रमाणात परवड होते. त्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. कधीकधी या जाचाला कंटाळून पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी शासनाने २००५ साली कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम काढले आहे.या अंतर्गत स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा संरक्षण अधिकारी व तालुकास्तरावर तालुका संरक्षण अधिकारी नेमण्यात आले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिला तालुकास्तरावरील संरक्षण अधिकाºयाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महिलेला न्यायालयीन लढाईसाठी सर्वोतोपरी मदत केली जाते.महिलेच्या तक्रारीनुसार विधी सल्लागाराच्या मार्गदर्शनात न्यायालयात केस उभी केली जाते. संबंधित महिलेच्या न्यायालयीन खर्चाची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत उचलली जाते.२००५ ते २०१७ या कालावधीत सुमारे २०० महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या. त्यांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागाने उचलली. त्यापैकी ३४ प्रकरणांचा न्यायालयाचा निकाल लागला असून १६६ प्रकरणे प्रलंबित आहेत.कायद्याबाबत महिलांमध्ये जनजागृतीचा अभावकौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या संपूर्ण महिलांच्या संरक्षणाची व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभाग उचलतो. महिलांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अभय केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये संरक्षण अधिकाºयाची नेमणूक केली आहे. मात्र याबाबतची फारशी जनजागृती झाली नसल्याने पीडित महिला अभय केंद्रात जाण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्येच जात असल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.