शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

By यदू जोशी | Updated: December 15, 2023 04:53 IST

प्रवाशांची मोठी पसंती

यदु जोशी

नागपूर :  महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळाने बांधलेला समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरत आहे. या महामार्गावर वर्षभरात ६० लाख वाहनांनी ये-जा केली. ४२१ कोटी रुपयांचा टोल भरला गेला. लोकांनी फार मोठ्या प्रमाणात या ‘समृद्धी’ला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीच्या टप्पा एकचे उद्घाटन झाले होते.   समृद्धीच्या रचनेत दोष असल्याने अपघात होतात, हा तर्क निराधार असल्याचे अपघातांची कारणे बघितली असता स्पष्ट होते.

‘एमएसआरडीस’ने ‘सेव्ह लाइफ इंडिया’कडून प्रत्येक दुर्घटनेचे विश्लेषण करून डेटा तयार केला आहे. ६० लाख वाहनांनी ये-जा केली व त्यातील केवळ ७५ वाहनांचे अपघात हे जीवघेणे ठरले. अपघातावरील उपाययोजनांचे परिणाम दिसत आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी ‘लोकमत’ला दिली.

विधिमंडळ अधिवेशनासाठी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी हे समृद्धी महामार्गानेच नागपूरला पोहोचले. सर्वपक्षीय आमदारांनी या मार्गाचे कौतुकच केले. हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे राज्याची भाग्यरेषा आहे. त्याचवेळी या महामार्गावर मध्येमध्ये फूड कोर्ट असावेत, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी, असा  प्रातिनिधिक सूर आहे.

ही आहेत दुर्घटनांची कारणे

घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने केलेले ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, वाहन सुस्थितीत नसणे, वाहन अवैधरीत्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षेविषयी न घेतलेली काळजी, चालक सतर्क नसणे, वाहनांतील बिघाड, आग लागणे, वाहनांचा तोल जाऊन ते उलटणे, प्राणी अचानक वाहनासमोर येणे ही अपघातांची विविध कारणे होती.

१४३ मृत्यू अन् त्यांची कारणे

अपघाताचे कारण        अपघात मृत्यू

वाहनावरील नियंत्रण सुटले  २१           ३५

झोप लागल्याने अपघात      ११         १८

टायर फुटले                    ०९            ११

तांत्रिक बिघाड                 ०१            ०२

मागून ठोस मारणे             ११              २६

अतिवेग                              ०८            ११

आग                             ०१         २५

मागून आदळणे                ०२            ०४

इतर                                 ११         ११

महामार्गावरच्या उपाययोजना

महामार्ग सुरक्षा पोलिसांना १५ अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स वाहने पेट्रोलिंगसाठी देण्यात आली.

परिवहन विभागास ८ वाहने देण्यात आली.

राज्य सुरक्षा मंडळाचे कर्मचारी संपूर्ण महामार्गावर तैनात करण्यात आले.

डायल १०८ सेवा, ही महामार्गालगतच्या ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यात आली आहे. अपघातानंतर ५ ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते.

वाहनचालक दारू प्यायलेला आहे का, याची तपासणी केली जाते. वाहने कशी चालवावीत याचे समुपदेशन केले जाते.

चालकाला झोप येऊ नये यासाठी विशिष्ट अंतरावर रंगीबेरंगी शिल्पकृतींची उभारणी.

नागपूरला येताना मी, भारती लव्हेकर, मोनिका राजळे, गीता जैन, मनीषा चौधरी, सीमा हिरे या आमदारांनी समृद्धीने प्रवास केला. वेगाची मर्यादा पाळली व वाहतुकीचे सर्व नियम पाळले तर या महामार्गावर कोणताही धोका नाही. हा नावाप्रमाणे समृद्धी महामार्ग आहे.

- मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार