शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

By यदू जोशी | Updated: December 15, 2023 04:53 IST

प्रवाशांची मोठी पसंती

यदु जोशी

नागपूर :  महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळाने बांधलेला समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरत आहे. या महामार्गावर वर्षभरात ६० लाख वाहनांनी ये-जा केली. ४२१ कोटी रुपयांचा टोल भरला गेला. लोकांनी फार मोठ्या प्रमाणात या ‘समृद्धी’ला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीच्या टप्पा एकचे उद्घाटन झाले होते.   समृद्धीच्या रचनेत दोष असल्याने अपघात होतात, हा तर्क निराधार असल्याचे अपघातांची कारणे बघितली असता स्पष्ट होते.

‘एमएसआरडीस’ने ‘सेव्ह लाइफ इंडिया’कडून प्रत्येक दुर्घटनेचे विश्लेषण करून डेटा तयार केला आहे. ६० लाख वाहनांनी ये-जा केली व त्यातील केवळ ७५ वाहनांचे अपघात हे जीवघेणे ठरले. अपघातावरील उपाययोजनांचे परिणाम दिसत आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी ‘लोकमत’ला दिली.

विधिमंडळ अधिवेशनासाठी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी हे समृद्धी महामार्गानेच नागपूरला पोहोचले. सर्वपक्षीय आमदारांनी या मार्गाचे कौतुकच केले. हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे राज्याची भाग्यरेषा आहे. त्याचवेळी या महामार्गावर मध्येमध्ये फूड कोर्ट असावेत, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी, असा  प्रातिनिधिक सूर आहे.

ही आहेत दुर्घटनांची कारणे

घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने केलेले ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, वाहन सुस्थितीत नसणे, वाहन अवैधरीत्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षेविषयी न घेतलेली काळजी, चालक सतर्क नसणे, वाहनांतील बिघाड, आग लागणे, वाहनांचा तोल जाऊन ते उलटणे, प्राणी अचानक वाहनासमोर येणे ही अपघातांची विविध कारणे होती.

१४३ मृत्यू अन् त्यांची कारणे

अपघाताचे कारण        अपघात मृत्यू

वाहनावरील नियंत्रण सुटले  २१           ३५

झोप लागल्याने अपघात      ११         १८

टायर फुटले                    ०९            ११

तांत्रिक बिघाड                 ०१            ०२

मागून ठोस मारणे             ११              २६

अतिवेग                              ०८            ११

आग                             ०१         २५

मागून आदळणे                ०२            ०४

इतर                                 ११         ११

महामार्गावरच्या उपाययोजना

महामार्ग सुरक्षा पोलिसांना १५ अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स वाहने पेट्रोलिंगसाठी देण्यात आली.

परिवहन विभागास ८ वाहने देण्यात आली.

राज्य सुरक्षा मंडळाचे कर्मचारी संपूर्ण महामार्गावर तैनात करण्यात आले.

डायल १०८ सेवा, ही महामार्गालगतच्या ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यात आली आहे. अपघातानंतर ५ ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते.

वाहनचालक दारू प्यायलेला आहे का, याची तपासणी केली जाते. वाहने कशी चालवावीत याचे समुपदेशन केले जाते.

चालकाला झोप येऊ नये यासाठी विशिष्ट अंतरावर रंगीबेरंगी शिल्पकृतींची उभारणी.

नागपूरला येताना मी, भारती लव्हेकर, मोनिका राजळे, गीता जैन, मनीषा चौधरी, सीमा हिरे या आमदारांनी समृद्धीने प्रवास केला. वेगाची मर्यादा पाळली व वाहतुकीचे सर्व नियम पाळले तर या महामार्गावर कोणताही धोका नाही. हा नावाप्रमाणे समृद्धी महामार्ग आहे.

- मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार