शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

By यदू जोशी | Updated: December 15, 2023 04:53 IST

प्रवाशांची मोठी पसंती

यदु जोशी

नागपूर :  महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळाने बांधलेला समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरत आहे. या महामार्गावर वर्षभरात ६० लाख वाहनांनी ये-जा केली. ४२१ कोटी रुपयांचा टोल भरला गेला. लोकांनी फार मोठ्या प्रमाणात या ‘समृद्धी’ला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी समृद्धीच्या टप्पा एकचे उद्घाटन झाले होते.   समृद्धीच्या रचनेत दोष असल्याने अपघात होतात, हा तर्क निराधार असल्याचे अपघातांची कारणे बघितली असता स्पष्ट होते.

‘एमएसआरडीस’ने ‘सेव्ह लाइफ इंडिया’कडून प्रत्येक दुर्घटनेचे विश्लेषण करून डेटा तयार केला आहे. ६० लाख वाहनांनी ये-जा केली व त्यातील केवळ ७५ वाहनांचे अपघात हे जीवघेणे ठरले. अपघातावरील उपाययोजनांचे परिणाम दिसत आहेत, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी ‘लोकमत’ला दिली.

विधिमंडळ अधिवेशनासाठी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी हे समृद्धी महामार्गानेच नागपूरला पोहोचले. सर्वपक्षीय आमदारांनी या मार्गाचे कौतुकच केले. हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे राज्याची भाग्यरेषा आहे. त्याचवेळी या महामार्गावर मध्येमध्ये फूड कोर्ट असावेत, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी, असा  प्रातिनिधिक सूर आहे.

ही आहेत दुर्घटनांची कारणे

घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने केलेले ओव्हरटेक, लेनची शिस्त न पाळणे, वाहन सुस्थितीत नसणे, वाहन अवैधरीत्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षेविषयी न घेतलेली काळजी, चालक सतर्क नसणे, वाहनांतील बिघाड, आग लागणे, वाहनांचा तोल जाऊन ते उलटणे, प्राणी अचानक वाहनासमोर येणे ही अपघातांची विविध कारणे होती.

१४३ मृत्यू अन् त्यांची कारणे

अपघाताचे कारण        अपघात मृत्यू

वाहनावरील नियंत्रण सुटले  २१           ३५

झोप लागल्याने अपघात      ११         १८

टायर फुटले                    ०९            ११

तांत्रिक बिघाड                 ०१            ०२

मागून ठोस मारणे             ११              २६

अतिवेग                              ०८            ११

आग                             ०१         २५

मागून आदळणे                ०२            ०४

इतर                                 ११         ११

महामार्गावरच्या उपाययोजना

महामार्ग सुरक्षा पोलिसांना १५ अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स वाहने पेट्रोलिंगसाठी देण्यात आली.

परिवहन विभागास ८ वाहने देण्यात आली.

राज्य सुरक्षा मंडळाचे कर्मचारी संपूर्ण महामार्गावर तैनात करण्यात आले.

डायल १०८ सेवा, ही महामार्गालगतच्या ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यात आली आहे. अपघातानंतर ५ ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते.

वाहनचालक दारू प्यायलेला आहे का, याची तपासणी केली जाते. वाहने कशी चालवावीत याचे समुपदेशन केले जाते.

चालकाला झोप येऊ नये यासाठी विशिष्ट अंतरावर रंगीबेरंगी शिल्पकृतींची उभारणी.

नागपूरला येताना मी, भारती लव्हेकर, मोनिका राजळे, गीता जैन, मनीषा चौधरी, सीमा हिरे या आमदारांनी समृद्धीने प्रवास केला. वेगाची मर्यादा पाळली व वाहतुकीचे सर्व नियम पाळले तर या महामार्गावर कोणताही धोका नाही. हा नावाप्रमाणे समृद्धी महामार्ग आहे.

- मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार