शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

गंगाजमुना चिखलीत नेण्याचा होता प्रस्ताव

By admin | Updated: February 8, 2015 01:17 IST

गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच

१९८० मध्ये झाले होते आंदोलन : ग्वाल्हेरच्याच लोकांचा विरोधराहुल अवसरे - नागपूरनागपूर : गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच लोकांनी विरोध केला होता. कालांतराने हा प्रस्तावच बारगळला, अशी जाणकार सूत्रांची माहिती आहे. वस्ती हटाव आंदोलन १९८० मध्ये वारांगनांची ही वस्ती हटविण्यासाठी सर्वपक्षीय मोठे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना कोणतेही पाठबळ नसल्याने हे आंदोलन काही नेत्यांनी दडपले होते. या वस्तीला वारंवार विरोध होत राहिल्याने ही वस्ती चिखली भागात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वारांगनांच्या विरोधाला काही नेत्यांचा पाठिंबा असल्याने प्रस्ताव तसाच राहिला. पुढे पुनर्वसन म्हणून हा भाग चिखलीत नेल्यास या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. ही चूक शासनाच्या लक्षात येताच हा प्रस्ताव कायमचा बारगळला. तेव्हा वारांगनांच्या मुलींनाही लागायची हळदपूर्वी रेड लाईट एरियात केवळ छत्तीसगड आणि ओडिशातील वारांगनाच देहव्यवसाय करायच्या त्यांच्या मुली लग्न होऊन नांदायला जायच्या. पुढे या वस्तीत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वारांगना आणि दलाल आले. ग्वाल्हेरपासून १०-१५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेशीमपुरा आणि बदनापुरा भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. परंपरेनुसार हा धंदा चालतो. भाऊ बहिणीकडून, पती पत्नीकडून, आई-वडील मुलीकडून हा व्यवसाय करवून घेतात. लहान मुलींची खरेदी-विक्री होते, अशीही या सूत्रांची माहिती आहे. मुलींचे लग्नच जुळत नव्हतेया वस्तीत सर्वसामान्य जीवन जगणारे लोकही राहत होते. परंतु वस्तीत चालणाऱ्या देहव्यवसायामुळे मुलींचे लग्नच जुळत नव्हते. जुळलेले लग्न तुटत होते. लग्नाची मोठी समस्या निर्माण होत होती. पुढे देहव्यापारातील लोकांची दादागिरी वाढून मोहल्ल्यातील लोकांसोबत हाणामाऱ्या व्हायच्या. ग्वाल्हेरचे प्राबल्य१९८० पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडीची कारवाई तीव्र केली आणि ग्वाल्हेर भागातील अर्धेअधिक लोक पळून जाऊन गंगाजुमानात स्थायिक झाले. अल्पवयीन मुलींनाही या धंद्यात गुंतवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा धंदा सुरू केला व पाहता पाहता ते मालामाल झाले. त्यांच्या धंद्याला कंटाळून स्थानिक सामान्य रहिवाशांनी मिळेल त्या भावात आपली घरेदारे विकली. आता या ठिकाणी वारांगनांचे मोठमोठे इमले आहेत. ग्वाल्हेरकडील लोकांच्या प्राबल्यामुळे छत्तीसगडी आणि ओडिशातील वारांगनांची संख्याही कमी झाली. ग्वाल्हेर भागातून आलेल्या वारंगनांच्या फैलावलेल्या या धंद्यामुळे सामान्यांनी जीवन जगणे मुश्कील होऊन हे आंदोलन केले होते. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या कडक कारवाईमुळे येथील रहिवाशांच्या जुन्या आंदोलनाला उजाळा मिळालेला आहे.