शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गंगाजमुना चिखलीत नेण्याचा होता प्रस्ताव

By admin | Updated: February 8, 2015 01:17 IST

गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच

१९८० मध्ये झाले होते आंदोलन : ग्वाल्हेरच्याच लोकांचा विरोधराहुल अवसरे - नागपूरनागपूर : गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच लोकांनी विरोध केला होता. कालांतराने हा प्रस्तावच बारगळला, अशी जाणकार सूत्रांची माहिती आहे. वस्ती हटाव आंदोलन १९८० मध्ये वारांगनांची ही वस्ती हटविण्यासाठी सर्वपक्षीय मोठे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना कोणतेही पाठबळ नसल्याने हे आंदोलन काही नेत्यांनी दडपले होते. या वस्तीला वारंवार विरोध होत राहिल्याने ही वस्ती चिखली भागात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वारांगनांच्या विरोधाला काही नेत्यांचा पाठिंबा असल्याने प्रस्ताव तसाच राहिला. पुढे पुनर्वसन म्हणून हा भाग चिखलीत नेल्यास या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. ही चूक शासनाच्या लक्षात येताच हा प्रस्ताव कायमचा बारगळला. तेव्हा वारांगनांच्या मुलींनाही लागायची हळदपूर्वी रेड लाईट एरियात केवळ छत्तीसगड आणि ओडिशातील वारांगनाच देहव्यवसाय करायच्या त्यांच्या मुली लग्न होऊन नांदायला जायच्या. पुढे या वस्तीत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वारांगना आणि दलाल आले. ग्वाल्हेरपासून १०-१५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेशीमपुरा आणि बदनापुरा भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. परंपरेनुसार हा धंदा चालतो. भाऊ बहिणीकडून, पती पत्नीकडून, आई-वडील मुलीकडून हा व्यवसाय करवून घेतात. लहान मुलींची खरेदी-विक्री होते, अशीही या सूत्रांची माहिती आहे. मुलींचे लग्नच जुळत नव्हतेया वस्तीत सर्वसामान्य जीवन जगणारे लोकही राहत होते. परंतु वस्तीत चालणाऱ्या देहव्यवसायामुळे मुलींचे लग्नच जुळत नव्हते. जुळलेले लग्न तुटत होते. लग्नाची मोठी समस्या निर्माण होत होती. पुढे देहव्यापारातील लोकांची दादागिरी वाढून मोहल्ल्यातील लोकांसोबत हाणामाऱ्या व्हायच्या. ग्वाल्हेरचे प्राबल्य१९८० पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडीची कारवाई तीव्र केली आणि ग्वाल्हेर भागातील अर्धेअधिक लोक पळून जाऊन गंगाजुमानात स्थायिक झाले. अल्पवयीन मुलींनाही या धंद्यात गुंतवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा धंदा सुरू केला व पाहता पाहता ते मालामाल झाले. त्यांच्या धंद्याला कंटाळून स्थानिक सामान्य रहिवाशांनी मिळेल त्या भावात आपली घरेदारे विकली. आता या ठिकाणी वारांगनांचे मोठमोठे इमले आहेत. ग्वाल्हेरकडील लोकांच्या प्राबल्यामुळे छत्तीसगडी आणि ओडिशातील वारांगनांची संख्याही कमी झाली. ग्वाल्हेर भागातून आलेल्या वारंगनांच्या फैलावलेल्या या धंद्यामुळे सामान्यांनी जीवन जगणे मुश्कील होऊन हे आंदोलन केले होते. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या कडक कारवाईमुळे येथील रहिवाशांच्या जुन्या आंदोलनाला उजाळा मिळालेला आहे.