लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पाेलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कंबर कसली असून, तालुक्यात विविध ठिकाणी धाड टाकून १२ आराेपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अंदाजे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गाेंडेगाव शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर पाेलिसांनी धाड टाकून आराेपी प्रभाकर पाटील, भीमराव कडबे (दाेन्ही रा. नरखेड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून माेहफुलाचा सडवा व दारू काढण्याच्या साहित्यासह २९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच पिठाेरी शिवारात केलेल्या कारवाईत आराेपी श्रावण भारसाकडे (रा. पिठाेरी) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून माेहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य व (एमएच-४०/एजी-६०७९)ची दुचाकी असा एकूण ६०,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिठाेरी ते नरखेड मार्गावर आराेपी राॅबिन पिलाजी नारनवरे व विलास धकीते (दाेन्ही रा. नरखेड) हे एमएच-४०/बीएच-१०२२ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावठी दारूची अवैध वाहतूक करताना आढळून येताच, पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ४५ लिटर गावठी दारू व दुचाकी असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पाेलिसांनी खापरी (सावरगाव) शिवारात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर धाड टाकली. यात आराेपी भीमराव जानराव साेमकुवर, रामा भाऊराव लंगडे (दाेन्ही रा. राजनी), नंदू शेषराव घाटाेड (रा. सावरगाव), संदीप रामपंत पांडे, सुनील केशव ठवरे दाेन्ही (रा. सिंदी), सुरेंद्र महादेव ढाेके (रा. पेठ बुधवार), काटाेल व संदीप गाेपाळ कुंभरे (रा. मन्नाथ खेडी) या सात जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत एमएच-३१/ईक्यू-२५८० क्रमांकाचे चारचाकी वाहन, तीन माेबाईल हॅण्डसेट व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ५ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच अवैधरीत्या सट्टापट्टी लिहिणाऱ्या एका आराेपीविरुद्ध कलम १२ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी दिली.
याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, ब्रह्मदेव देशमुख, पाेलीस उपनिरीक्षक अरुण खुटेमाटे करत आहेत. तालुक्यात अवैध धंदे चालविणाऱ्यांवर पाेलिसांची करडी नजर असून, नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत पाेलीस ठाण्यात माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार जयपालसिंग गिरासे यांनी केले आहे.