शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

नफाखोर महागाई; १० रुपयांचे कांदे ४० ला तर ८ रुपयांचे बटाटे २५ रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 07:30 IST

Nagpur News सध्या भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळमध्ये बहुतांश भाज्या ५० रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकल्या जात आहेत.

ठळक मुद्देवाहतूक शुल्क व सेस शुल्क नाममात्र जास्त किमतीत भाज्यांची विक्री, सामान्य त्रस्त

शाहनवाज आलम

नागपूर : सध्या भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. किरकोळमध्ये बहुतांश भाज्या ५० रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकल्या जात आहेत. किरकोळ विक्रेते ठोक बाजारात १० रुपयात मिळणारे कांदे तब्बल ३० रुपये नफा कमवून ४० रुपयात आणि ८ रुपयांचे बटाटे २५ ते ३० रुपयात विक्री करीत आहेत. किरकोळ विक्रेते सर्व भाज्यांवर १० ते ५० रुपयांपर्यंत नफा कमवित आहेत. विक्रेते भाज्यांचे पीक खराब झाल्याचे आणि कमी आवक असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. ठोकमधून किरकोळ बाजारात आणण्याचा खर्च कमीच आहे. त्यानंतर जास्त भावात विक्री करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहक त्रस्त असून प्रशासन कुठलीही कारवाई करीत नसल्यामुळे विक्रेत्यांचे फावत आहे.

लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी कळमना ठोक भाजी बाजाराची पाहणी केली आणि भाज्यांचे मूल्य, वाहतूक आणि सेसची तपासणी केली. त्यात किरकोळ भाजी विक्रेत्यांची नफाखोरी दिसून आली.

अद्रक व लसूण सर्वाधिक महाग

कळमन्यात लसूण १५ ते २० रुपये आणि अद्रक १५ ते १८ रुपये आहे, पण किरकोळमध्ये ५० ते ७० रुपयांपर्यंत भाव आहेत. जास्त पैसे कमावून ग्राहकांच्या माथी मारत आहेत.

१०० रुपयांच्या भाजीवर १.०५ रुपये सेस

किरकोळ विक्रेते भाज्यांच्या वाढत्या किमतीवर ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. ठोक बाजारात भाज्या महाग आणि आवक कमी असल्याचे कारण सांगून जास्त पैसे वसूल करीत आहेत. याशिवाय ग्राहकांना वाहतूक भाडे आणि सेसचे कारण सांगत आहेत. कळमन्यात १०० रुपयांच्या खरेदीवर केवळ १.०५ रुपये सेस आकारला जातो, ही सत्यस्थिती आहे.

वाहतूक खर्च कमीच

शहराच्या कोणत्याही भागापासून कळमना बाजार केवळ ५ ते १० किमी अंतरावर आहे. या बाजारात शहरात भाजीपाला नेण्यासाठी १०० ते ३०० रुपये खर्च येतो. त्यानंतरही किरकोळ विक्रेत्यांनी जास्त नफा कमविण्यासाठी महागाई वाढविली आहे.

काय करत आहे प्रशासन?

कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यानंतरही भाजी विक्रेते मनमानी मूल्य आकारून भाज्यांची विक्री करीत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही आणि सरकारने महागाई कमी करण्यासाठी कोणतेही पाऊले उचललेले नाही.

टॅग्स :vegetableभाज्या