शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

बोगस बियाणे विक्रीतून कंपन्यांची नफाखोरी

By admin | Updated: July 10, 2016 01:53 IST

विदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची

पाच कंपन्यांचा समावेश : हजारो शेतकऱ्यांचा घातजीवन रामावत ल्ल नागपूरविदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कृषी विभागाने या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत परीक्षण केले असता हा भंडाफोड झाला आहे. या कंपन्यांमध्ये कावेरी सीड्स, मे. दप्तरी अ‍ॅग्रो प्रा. लि. सेलू, यशोदा सीड्स, कंपनी हिंगणघाट,रायझिंग सन सीड्स, नागपूर आणि स्वत: शासनाच्या महाबीज कंपनीचा समावेश आहे. यापैकी कावेरी सीड्स कंपनीने कापूस आणि इतर सर्व कंपन्यांनी धान बियाण्याची विक्री केली आहे. विशेष म्हणजे,‘लोकमत’ने मागील १५ दिवसांपूर्वीच रायझिंग सन या कंपनीच्या बोगस धान बियाण्याचा भांडाफोड केला होता. मात्र कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी थातूरमातूर कारवाईचा दिखावा करून, त्या कंपनीला पाठीशी घातले होते. माहिती सूत्रानुसार मागील काही दिवसांत कृषी विभागाकडे बोगस धान बियाण्याच्या हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना परस्पर दुसरे बियाणे देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशाप्रकारे या बियाणे कंपन्यांचा सर्वत्र तांडव सुरू असताना कृषी विभाग मात्र मूग गिळून बसला आहे. कृषी विभागाच्या कागदावर ७ जुलैपर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असून, विभागातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिवाय या सर्व शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी करून, त्याची पेरणी केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतावरील बियाण्यांची उगवणच झालेली नाही. यामुळे अगोदरच नापिकी आणि दुष्काळाच्या चक्रात अडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा आता पुन्हा या कंपन्यांनी घात केला आहे. खटले दाखल करणार या सर्व कंपन्यांनी आणि बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने नापास (फेल) झाले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आणि त्यांचे बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. यात संबंधित पाच बियाणे उत्पादक कंपन्यांसह अहेरी येथील प्रकाश कृषी सेवा केंद्र, मनोज कृषी सेवा केंद्र, भडाळा येथील नरेंद्र कृषी सेवा केंद्र, शुभम कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. - एस.पी. गावंडे विभागीय गुणनियंत्रण अधिकारी