शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिला स्वयं सहाय्यता गटांची उत्पादने गुणवत्तापूर्णच; जि.प.अध्यक्ष मुक्ता कोकड्डे

By गणेश हुड | Updated: February 17, 2024 18:34 IST

ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांचा दर्जा हा गुणवत्तापूर्णच असतो.

नागपूर: ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांचा दर्जा हा गुणवत्तापूर्णच असतो. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मोठी बाजारपेठ आज या ठिकाणी उपलब्ध  झाली आहे. महिलांनी मालाच्या विक्रीसाठी सरस प्रदर्शनांसह फेसबूक, युट्युब या साधनांचाही वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी शनिवारी केले.  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरसच्या उद्घाटन प्रसंगी  अध्यक्षीय भाषणात मुक्ता कोकड्डे बोलत होत्या.

व्यासपीठावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व उद्घाटक रुचेश जयवंशी,  जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती  अवंतिका लेकुरवाळे,विभागीय उपायुक्त विकास  कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी  तुषार ठोंबरे, अवर सचिव धनवंत माळी,  उपसंचालक  शितल कदम, उपसंचालक महेश कारंडे उपस्थित होते. नागपूर मध्ये महालक्ष्मी सरसचे आयोजन करून एक  विक्रीची मोठी संधी महिलांना मिळाली आहे. महिलांनी लोणची आचार व पापड या पुरता आपला व्यवसाय मर्यादित न ठेवता  राहता कापड उद्योग, कलाकसुरीच्या वस्तू, विविध शोभेच्या वस्तू,  ज्वेलरी अशी अनेक उत्पादने तयार करीत आहेत.प्रदर्शनाला नागपूर शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुक्ता कोकड्डे यांनी यावेळी व्यक्त केला.

नागपूर जिल्ह्यामध्ये अभियानाच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षण घेवून स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. भिवापूर तालुक्यात उत्पादक गट स्थापन करून प्रसिद्ध भिवापूरची मिरची हे उत्पादन उत्तम लेबलिंग पॅकेजिंग करून नागरत्न या ब्रँड खाली त्यांची विक्री बाजारपेठेत केली जात आहे.  हिंगणा तालुक्यातील महिला हायड्रोपोनिक या नव तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्यावर  भाजीपाल्याचे उत्पादन आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय विस्तारित करीत असल्याचे मत  सौम्या शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. अवंतिका लेकुरवाळे यांनी महिला सर्वच क्षेत्रात पुढे येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर  आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर यांनी मानले. ही प्रदर्शनी २६ फेब्रुवारीपर्यंत राहणार असून येथे महिला बचत गटांचे विविध उत्पादनाचे ३०० स्टॉल लावण्यात आले आहे.  १५ लाख महिला लखपतीजीवनोन्नती अभियानाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले,  उमेद अभियान आता राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर प्रदर्शन भरविण्यासारख्या उपक्रमासोबतच  ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. येत्या वर्षभरातच महाराष्ट्रात १७ लाख महिला लखपती करण्याचा आराखडा कृती आराखडा तयार आहे. यापैकी १५ लाख महिला लखपती होण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. उत्पादनांची  विक्री व्हावी यासाठी  ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ऑनलाईन माध्यमांचा वापर देखील  महिला करीत आहेत आणि त्यावर आपले उत्पादन भारतातच नव्हे तर विदेशात देखील विक्री करीत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर