शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

पर्यटनस्थळ असलेल्या रामटेक बसस्थानकाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:41 IST

ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या बसफेऱ्यामुळे प्रवासी त्रस्त रामटेक आगार प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे प्रवाशांना बसायला जागा अपुरी पडत आहे. त्यातही रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना अनेक हाल सोसावे लागतात, शिवाय अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. परंतु या गंभीर प्रकाराकडे आगार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.येथील बसस्थानकावर भरउन्हात प्रवासी उभे राहतात. पावसाळा व उन्हाळ्यात बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. अनेकदा प्रवासी जाळीजवळच्या पारीवर बसतात. बाजूलाच सुलभ शौचालयाचे गडर चेंबर आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना नाकावर रूमाल ठेवूनच बसावे लागत आहे. बसस्थानकावरील घाण व दुर्गंधीमुळे शेकडो प्रवासी बसस्थानकाबाहेर फिरताना आढळतात. वेळप्रसंगी धावतपळत प्रवाशांना एसटी पकडावी लागते. बसस्थानकाची अशी गंभीर अवस्था असताना आगार प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे याबाबत विद्यार्थी, महिला, शासकीय-निमशासकीय कर्मचारी, वयोवृद्ध तसेच इतर प्रवासी बसस्थानकावरील समस्या व होणारी गैरसोय याबाबत आगार प्रशासनाच्या लक्षात आणून देत तक्रारीही करतात. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.नागपूरला जाणाऱ्या बसेस ज्या फलाटावर थांबतात, त्या बाजूला प्रवासी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना भरउन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात ही बाब एखाद्या प्रवाशाच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे रामटेकवरून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन प्रवासी निवारा तात्काळ निर्माण करणे गरजेचे आहे.

प्रवाशाच्या तक्रारीला केराची टोपलीबसस्थानकावरील विविध समस्यांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात बसण्यासाठी प्रवाशांना जागा शोधावी लागते. या बसस्थानकामध्ये काही तास असे असतात की, प्रवाशांना बसायला जागा न मिळाल्याने तासन्तास उभे राहावे लागते. अपुऱ्या बसफेऱ्या व विविध समस्यांमुळे अनेकदा प्रवासी आगार प्रशासनाकडे तक्रारी करतात. परंतु प्रवाशांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार आगार प्रशासनाकडून होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ