शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रकाशनाविनाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 11:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार आहे. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखंड तयार, पण प्रकाशनासाठी वेळच नाहीशासन उदासीन

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ डिसेंबरमध्ये येणार होता. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड लोकांच्या हाती येतील, असा विश्वास प्रकाशन समितीने व्यक्त केला होता. हे खंड तयारही आहेत. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. परंतु ते शक्य होऊ शकले नाही. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित व्हावे, यासाठी लोकांचा रेटा वाढत चालला आहे. प्रकाशन समितीकडे यासंदर्भात अनेक निवेदने रोज पाठवली जात आहेत.

विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी स्पष्ट केले होते. या चार खंडांत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. हा खंडदेखील लवकरच प्रकशित होईल.

इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे. या ग्रंथाशिवाय सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर असून, येत्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत चार-पाच खंड विक्रीकरिता उपलब्ध होतील, या दृष्टीने समिती कार्य करीत असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु तेही शक्य होऊ शकलेले नाही.

सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड शासन प्रकाशित करू शकले नाही. तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यासही शासन अपयशी ठरले. दरम्यान, उच्च न्यायालयानेसुद्धा याची गंभीर दखल घेत शासनाला जाब विचारला आहे, असे असतानाही जे खंड तयार आहेत. त्याचे साधे प्रकाशन करण्यासाठीसुद्धा शासनाकडे वेळ नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाची ही कृती जाणीवपूर्वक तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेबांचा ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार झाला आहे. तो महापरिनिर्वाणदिनी प्रकाशित व्हावा, यासाठी समितीने प्रयत्न केले. परंतु ते शक्य होऊ शकले नाही.

- डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

- ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ अगोदर तयार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी प्रकाशित करण्याची मागणी केली. ती पूर्ण झालेली नाही. किमान महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी तो प्रकाशित व्हायला हवा होता. प्रकाशनासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांची तारीख घेणे, त्यांना दिवसाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी ही समितीची आहे. त्यामुळे हे अपयश पूर्णपणे समितीचे आहे. केवळ हाच ग्रंथ नव्हे तर अनेक ग्रंथ तयार आहेत. परंतु ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही तर त्याचा फायदा काय?

- प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर

टॅग्स :GovernmentसरकारDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरEconomyअर्थव्यवस्थाliteratureसाहित्य