शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रकाशनाविनाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 11:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार आहे. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखंड तयार, पण प्रकाशनासाठी वेळच नाहीशासन उदासीन

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ डिसेंबरमध्ये येणार होता. यासोबतच आणखीही तीन ते चार नवीन खंड लोकांच्या हाती येतील, असा विश्वास प्रकाशन समितीने व्यक्त केला होता. हे खंड तयारही आहेत. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे गेल्या ३० मार्च रोजी पुनर्गठन झाले. तेव्हापासून नवीन खंड प्रकाशनाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. परंतु ते शक्य होऊ शकले नाही. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित व्हावे, यासाठी लोकांचा रेटा वाढत चालला आहे. प्रकाशन समितीकडे यासंदर्भात अनेक निवेदने रोज पाठवली जात आहेत.

विजयादशमीच्या दिवशी एखादा ग्रंथ प्रकाशित होईल, अशी लोकांची इच्छा होती; परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर डिसेंबरपर्यंत किमान चार नवीन खंड प्रकाशित होणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी स्पष्ट केले होते. या चार खंडांत ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश आहे. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मुखपत्र असलेल्या ‘जनता’ या नियतकालिकाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. हा खंडदेखील लवकरच प्रकशित होईल.

इंग्रजी खंड-१३ च्या मराठी अनुवादित ग्रंथाचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. हा मराठी ग्रंथ १२०० पृष्ठांचा आहे. या ग्रंथाशिवाय सोर्स मटेरिअलचा खंड १ -‘डॉ. आंबेडकर ॲण्ड द मूव्हमेंट ऑफ अनटचेबल्स, खंड ६, खंड ८, खंड १० या ग्रंथाचे पुनर्मुद्रणाचे कामदेखील अंतिम टप्प्यावर असून, येत्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत चार-पाच खंड विक्रीकरिता उपलब्ध होतील, या दृष्टीने समिती कार्य करीत असल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु तेही शक्य होऊ शकलेले नाही.

सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड शासन प्रकाशित करू शकले नाही. तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यासही शासन अपयशी ठरले. दरम्यान, उच्च न्यायालयानेसुद्धा याची गंभीर दखल घेत शासनाला जाब विचारला आहे, असे असतानाही जे खंड तयार आहेत. त्याचे साधे प्रकाशन करण्यासाठीसुद्धा शासनाकडे वेळ नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाची ही कृती जाणीवपूर्वक तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेबांचा ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार झाला आहे. तो महापरिनिर्वाणदिनी प्रकाशित व्हावा, यासाठी समितीने प्रयत्न केले. परंतु ते शक्य होऊ शकले नाही.

- डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती

- ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ अगोदर तयार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी प्रकाशित करण्याची मागणी केली. ती पूर्ण झालेली नाही. किमान महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी तो प्रकाशित व्हायला हवा होता. प्रकाशनासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांची तारीख घेणे, त्यांना दिवसाचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी ही समितीची आहे. त्यामुळे हे अपयश पूर्णपणे समितीचे आहे. केवळ हाच ग्रंथ नव्हे तर अनेक ग्रंथ तयार आहेत. परंतु ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही तर त्याचा फायदा काय?

- प्रकाश बन्सोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर

टॅग्स :GovernmentसरकारDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरEconomyअर्थव्यवस्थाliteratureसाहित्य