शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

उपराजधानीतील तीव्र पाणीसंकटामुळे वीज उत्पादनाला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 10:53 IST

उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देअगोदरपासूनच सुरू आहे पाणीकपातबैठकीकडे लागले आहे लक्ष

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे. अगोदरपासूनच पाणीकपातीचा सामना करीत असलेल्या कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांचे वीज उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्यावर सद्यस्थितीत मौन साधले आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. जर पाण्याचा पुरवठा कमी झाला तर स्वाभाविकपणे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.‘महाजेनको’ने या केंद्रांसाठी मे महिन्यातच पेंच व तोतलाडोह येथील ‘डेड स्टॉक’मधून पाण्याची मागणी केली होती. १५ जुलैपर्यंतच वीज उत्पादन शक्य होईल, असे दोन्ही केंद्रांनी स्पष्ट केले होते. आता नागपुरात पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर महाजेनकोच्या दोन्ही केंद्रांवर तणाव वाढला आहे. दोन्ही वीज केंद्रांना पेंच व तोतलाडोह येथून पाणी मिळते. मात्र या दोन्ही जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज उत्पादन घटले तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल. परंतु राज्यातील इतर भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.कोराडी व खापरखेडा वीज केंद्रांसाठी प्रशासनाने एकूण ६८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणीसंकटामुळे याला कमी करून ४८ एमएम क्युब करण्यात आले आहे. प्रशासनाने कोराडी औष्णिक वीज केंद्रासाठी ३० तर खापरखेडा वीज केंद्रासाठी ३८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र सद्यस्थितीत पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, कोराडीला २० आणि खापरखेड्याला २८ एमएम क्युब पाणी दिले जात आहे.

आरक्षणाहून कमी पाण्याच्या उपयोगाचा दावादिलेल्या आरक्षणाहून कमी पाण्याचा उपयोग करण्यात येत असल्याचा दावा दोन्ही वीज केंद्रांनी केला आहे. सोबतच खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात दररोज १ लाख २० हजार एम क्युब पाणी रोज साठवले जात आहे. एक लाख एम क्युब पाण्याची मागणी असताना खापरखेड्यात जास्तीत जास्त ७५ हजार एम क्युब पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम क्युब पाण्याची आवश्यकता पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. कॉलनी तसेच प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा राख व्यवस्थापनात परत उपयोग करण्यात येत आहे. यासोबतच कॉलनीमध्ये पाण्याच्या बचतीसाठी सर्व उपाय करण्यात येत आहेत व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई