शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उपराजधानीतील तीव्र पाणीसंकटामुळे वीज उत्पादनाला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 10:53 IST

उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देअगोदरपासूनच सुरू आहे पाणीकपातबैठकीकडे लागले आहे लक्ष

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील वीजनिर्मिती केंद्रांसमोर संकट उभे ठाकले आहे. अगोदरपासूनच पाणीकपातीचा सामना करीत असलेल्या कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांचे वीज उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्यावर सद्यस्थितीत मौन साधले आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. जर पाण्याचा पुरवठा कमी झाला तर स्वाभाविकपणे उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे.‘महाजेनको’ने या केंद्रांसाठी मे महिन्यातच पेंच व तोतलाडोह येथील ‘डेड स्टॉक’मधून पाण्याची मागणी केली होती. १५ जुलैपर्यंतच वीज उत्पादन शक्य होईल, असे दोन्ही केंद्रांनी स्पष्ट केले होते. आता नागपुरात पाणीकपातीची घोषणा झाल्यानंतर महाजेनकोच्या दोन्ही केंद्रांवर तणाव वाढला आहे. दोन्ही वीज केंद्रांना पेंच व तोतलाडोह येथून पाणी मिळते. मात्र या दोन्ही जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज उत्पादन घटले तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल. परंतु राज्यातील इतर भागांमध्ये होत असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.कोराडी व खापरखेडा वीज केंद्रांसाठी प्रशासनाने एकूण ६८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र पाणीसंकटामुळे याला कमी करून ४८ एमएम क्युब करण्यात आले आहे. प्रशासनाने कोराडी औष्णिक वीज केंद्रासाठी ३० तर खापरखेडा वीज केंद्रासाठी ३८ एमएम क्युब पाणी आरक्षित केले आहे. मात्र सद्यस्थितीत पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, कोराडीला २० आणि खापरखेड्याला २८ एमएम क्युब पाणी दिले जात आहे.

आरक्षणाहून कमी पाण्याच्या उपयोगाचा दावादिलेल्या आरक्षणाहून कमी पाण्याचा उपयोग करण्यात येत असल्याचा दावा दोन्ही वीज केंद्रांनी केला आहे. सोबतच खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात दररोज १ लाख २० हजार एम क्युब पाणी रोज साठवले जात आहे. एक लाख एम क्युब पाण्याची मागणी असताना खापरखेड्यात जास्तीत जास्त ७५ हजार एम क्युब पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम क्युब पाण्याची आवश्यकता पुनर्प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. कॉलनी तसेच प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा राख व्यवस्थापनात परत उपयोग करण्यात येत आहे. यासोबतच कॉलनीमध्ये पाण्याच्या बचतीसाठी सर्व उपाय करण्यात येत आहेत व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात आला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई