शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गुरांच्या वैरणाची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी पशुपालकांना सोयाबीन पिकाच्या नासाडीमुळे चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी पशुपालकांना सोयाबीन पिकाच्या नासाडीमुळे चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात ४० हजार ३७१ पशुधन असून, चाराटंचाईची स्थिती पाहता, शासनाने चाराटंचाईच्या निवारणार्थ ५१ क्विंटल वैरण बियाण्यांचे वाटप केले. परंतु, शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वतःच वैरणाची लागवड केल्याने गुरांच्या वैरणाची समस्या सुटणार आहे.

पशुधनाच्या आकडेवारीनुसार गायवर्गीय पशुधन २२ हजार ४०१, म्हैसवर्गीय पशुधन २,९४०, शेळ्या-मेंढ्या १५ हजार ३० आहेत. यात प्रत्येकी मोठे पशुधन सहा किलो, लहान पशुधन तीन किलो व शेळ्या-मेंढ्यांना ०.६ किलोप्रमाणे संपूर्ण वर्षभरात १ लाख ६१ हजार ६४ मेट्रिक टन चारा लागतो. यापैकी ३९ हजार १५७ मेट्रिक टन चारा पिकाच्या उत्पादनातून मिळणार असून, वैरण पिकापासून ८०० मेट्रिक टन, बांध क्षेत्रातून १५० मेट्रिक टन, वनक्षेत्रातून ३७० मेट्रिक टन, गवती कुरण चराऊ क्षेत्रातून ५०० मेट्रिक टन, पडीक क्षेत्रातून ६०० मेट्रिक टन असा एकूण ४१ हजार ५७७ मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.

गहू, हरभरा या पिकांपासून मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पशुपालकांना एप्रिल २०२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजना १०० टक्के अनुदानावर ५१ क्विंटल वैरण बियाणे पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वितरित करण्यात येत आहे. यामुळे निर्माण होणारी चाराटंचाई टाळण्यास मदत होणार आहे. मात्र, मे, जून महिन्यात गुरांची काळजी घेताना मात्र पशुपालकांची तारांबळ उडणार आहे.

...

सोयाबीन पिकापासून मोठ्या प्रमाणात चारा मिळत होता. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. तालुक्यात उपलब्ध चाऱ्याची स्थिती लक्षात घेता, जून महिन्यात वेळेवर पाऊस आला नाही, तर कमी-अधिक प्रमाणात चाराटंचाई निर्माण हाेऊ शकते.

- डाॅ. हेमंत माळोदे, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, कळमेश्वर.