शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:12 IST

जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला.

ठळक मुद्देमृतदेह पोत्यात बांधलेला माथनी शिवारातील कन्हान नदीत गवसला

आॅनलाईन लोकमतनागपूर: जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.राजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.त्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.ते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.ते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.मोबाईल लोकेशनची तपासणीतक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लोकेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साडी व चादर महत्त्वाचे पुरावेराजू नारंग यांचा मृतदेह साडी व चादरीत गुंडाळलेला होता. त्यांच्या गळ्याला साडी गुंडाळलेली होती. मृतदेह भरण्यासाठी वापरण्यात आलेले पोते हे मिरचीचे होते. त्यामुळे साडी, चादर व पोते या तीन वस्तू तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हा