शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या अकाऊंटंटचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 11:12 IST

जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला.

ठळक मुद्देमृतदेह पोत्यात बांधलेला माथनी शिवारातील कन्हान नदीत गवसला

आॅनलाईन लोकमतनागपूर: जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील माथनी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाखाली सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोत्यात बांधलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह राजू गिरधारीलाल नारंग (५४, रा. देवकृपा हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर) यांचा असल्याचे तसेच ते व्यापाऱ्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ते बुधवारपासून (दि. २७) बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आला असून, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून या भागात फेकला असल्याची माहिती तपास अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली.राजू नारंग यांचा मृतदेह पोत्यात भरला असून, तो पिवळ्या रंगाच्या साडी आणि मळकट चादरीत गुंडाळलेला होता.त्यांचा आधी साडीने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून तो माथनी शिवारातील पुलावरून खाली फेकला असावा, असा अंदाज प्रमोद मडामे यांनी व्यक्त केला. त्यांच्या पॅन्टच्या खिशात आढळून आलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचेही पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह राजू नारंग यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले.ते गेल्या १८ वर्षांपासून नागपूर शहरातील व्यापारी प्रकाश वाधवानी यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून नोकरी करायचे. ते शांत स्वभावाचे असून, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने त्यांच्या रामदासपेठ (नागपूर) येथील कार्यालयात जायला निघाले. मात्र, १.३० वाजेपर्यंत ते कार्यालयात न पोहोचल्याने त्यांचे मालक वाधवानी यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहितीही कुटुंबीयांनी दिली.ते कार्यालयात पोहोचले नसल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांचा शोध घेतला. त्यांचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने शेवटी लकडगंज (नागपूर) पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून पोलीसही त्यांचा शोध घेत होते.मोबाईल लोकेशनची तपासणीतक्रार दाखल होताच लकडगंज पोलिसांनी राजू नारंग यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यांचा मोबाईल बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कळमना व डिप्टी सिग्नल भागात तर रात्री लोकमत चौकात कार्यरत असल्याचे आढळून आले. रात्री ८ नंतर त्यांच्या फोनचे लोकेशन वाडी येथे मिळाले. त्यानंतर त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ येत होता. त्यांच्याकडे बुधवारी २५ ते ३० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नव्हती, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या अपहरणात परिचित व्यक्तीचा सहभाग असून, अपहरणासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साडी व चादर महत्त्वाचे पुरावेराजू नारंग यांचा मृतदेह साडी व चादरीत गुंडाळलेला होता. त्यांच्या गळ्याला साडी गुंडाळलेली होती. मृतदेह भरण्यासाठी वापरण्यात आलेले पोते हे मिरचीचे होते. त्यामुळे साडी, चादर व पोते या तीन वस्तू तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Crimeगुन्हा