शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कैदीही करणार ‘एटीएम’ने ‘पेमेंट’

By admin | Updated: January 28, 2016 03:13 IST

तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे.

एसबीआयचे बनले खातेधारक : नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगातून पायलट प्रोजेक्टला सुरुवातनागपूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे. बुधवारी तुरुंग परिसरात आयोजित एका कार्यक्रमात कैद्यांना पासबुक आणि एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टला राज्यातील नऊ केंद्रीय तुरुंगात लागू करण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) डॉ. बी.के. उपाध्याय हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अधीक्षक योगेश देसाई, एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक बी. शंकर आणि सहायक महाव्यवस्थापक आलोक सिन्हा प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत असलेले जवळपास ८०० कैदी आहेत. तुरुंगात या कैद्यांकडून मजुरी करवून घेतली जाते. त्या मोबदल्यात त्यांना दिवसाप्रमाणे मजुरीसुद्धा दिली जाते; ती ४५ रुपये, ५० रुपये आणि ५५ रुपये अशी असते. ही मजुरीची रक्कम त्यांच्या नावाने तुरुंगातच जमा होत असते. त्यांना परिवाराकडूनसुद्धा एक ठराविक आर्थिक मदत मिळत असते. कैद्यांना कॅन्टीनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंची विक्री केली जाते. त्यांना एका महिन्यात दोन हजार रुपये खरेदी करण्याचे अधिकार असतात. है पैसे कैद्यांच्या नावाने जमा असलेल्या निधीमधून वसूल केले जाते. या कामासाठी कैद्यांचा लेखाजोखा सांभाळून ठेवण्यात आणि इतर कामांमध्ये खूप वेळ खर्ची पडतो. त्यामुळे डॉ. उपाध्याय यांनी महासंचालकपद स्वीकरताच कैद्यांना एसबीआयचे खातेधारक करण्याची योजना आखली, त्यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ही योजना सुरू केली. बुधवारी कैद्यांना पासबुकसह एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. यानंतर मजुरीची रक्कम कैद्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कैद्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मनीआॅर्डर पाठविण्याऐवजी थेट बचत खात्यात पैसे जमा करता येतील. तुरुंगातील कॅन्टीनमधून काही खरेदी केल्यास कैदी एटीएमद्वारे पेमेंट करतील. यासाठी कॅन्टीनमध्ये ‘स्वॅपिंग मशीन’ लावण्यात आली आहे. सध्या दोन हजार रुपयांची मर्यादा आहे. त्याला अडीच हजार रुपयापर्यंत वाढविण्यात येत आहे. कैद्यांना एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर मात्र कैदी आपल्या पत्त्याचे दस्ताऐवज सादर करून हे खाते नियमित करू शकतील. सध्या १५० कैद्यांना पासबुक व एटीएम कार्ड देण्यात आले आहेत. राज्यात नऊ केंद्रीय तुरुंग आहेत. यात १० हजारावर शिक्षा भोगत असलेले कैदी आहेत. नागपुरातील यशानंतर सर्वांनाच यात सामील केले जाईल. (प्रतिनिधी)