शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 21:59 IST

कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : संचित रजेची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.रामभरोसे ऊर्फ रंगा पन्नालाल मालविया (३७) असे बंदिवानाचे नाव असून तो कन्हान येथील रहिवासी आहे. बंदिवानाने वांरवार कायद्याचा भंग केल्यास संचित रजा मिळणे हा त्याच्या अधिकाराचा भाग रहात नाही. अशी प्रकरणे प्रशासनाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून राहतात. प्रशासनाने दाखविलेल्या विवेकबुद्धीला ठोस आधार असल्यास त्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास वाव नसतो असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.मालवियाला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याने आतापर्यंत ११ वर्षे १० महिन्यांवर शिक्षा भोगली आहे. २४ आॅगस्ट २०१७ रोजी सरकारने पोलीस पडताळणी अहवाल लक्षात घेता त्याचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली. यापूर्वी मालवियाला ८ आॅगस्ट २००८ रोजी अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी त्याने ११७ दिवस विलंबाने आत्मसमर्पण केले होते. तसेच, ७ सप्टेंबर २००९ रोजी संचित रजा (फर्लो) मंजूर केली असता त्याला अटक करून कारागृहात आणावे लागले होते. दरम्यान, तो १०५५ दिवस अवैधपणे कारागृहाबाहेर राहिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने एकदा आरोपीची संचित रजा देण्याची विनंती फेटाळली होती.

टॅग्स :jailतुरुंगHigh Courtउच्च न्यायालय