शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नासह पाणी प्रश्नाला प्राधान्य : अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:11 IST

महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ठळक मुद्देउत्पन्नाची साधने वाढविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्तअभिजित बांगर यांनी दिली.महापालिकेत रुजू झाल्यानंतर बांगर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यामुळे तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आगामी उन्हाळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येईल. जीएसटी लागू झाला आहे. जीएसटीच्या शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर महापालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे. हे अनुदान पुरेसे नाही. तथापी महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मालमत्ता कराच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात येईल. सोबतच महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक ठरले आहे.शहराच्या विकासासंदर्भात बोलताना आयुक्त बांगर म्हणाले नागरिकांकडून प्राप्त समस्या आणि त्यांच्या अडचणीनुसार शहरात काम करणे आवश्यक आहे. एकूणच शहरातील नागरिक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजना यशस्वीपणे राबविण्यावर आपला भर राहणार आहे. पालघर आणि अमरावती शहराचा अनुभव आपल्या पाठीशी असून शहराच्या विकासाकरिता लोकांकडून अभिप्रायांची अपेक्षा आहे. सामान्य जनता, प्रशासनासोबत काम करतानाच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार काम करण्याची भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले....तर वाद होणार नाहीनागरिकांची सेवा करणे हाच प्रामाणिक उद्देश असेल तर वाद होणार नाही, असेही मनपा आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचे तास वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. सर्वच ठिकाणी मनुष्यबळाची समस्या आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :commissionerआयुक्तAbhijit Bangarअभिजित बांगर