शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उत्पन्नासह पाणी प्रश्नाला प्राधान्य : अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:11 IST

महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

ठळक मुद्देउत्पन्नाची साधने वाढविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या महसूलवाढीसह शहराची पाणी समस्या सोडविण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्तअभिजित बांगर यांनी दिली.महापालिकेत रुजू झाल्यानंतर बांगर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यामुळे तलावांमध्ये पाणीसाठा कमी आहे. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आगामी उन्हाळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येईल. जीएसटी लागू झाला आहे. जीएसटीच्या शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर महापालिकेचे उत्पन्न अवलंबून आहे. हे अनुदान पुरेसे नाही. तथापी महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मालमत्ता कराच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात येईल. सोबतच महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक ठरले आहे.शहराच्या विकासासंदर्भात बोलताना आयुक्त बांगर म्हणाले नागरिकांकडून प्राप्त समस्या आणि त्यांच्या अडचणीनुसार शहरात काम करणे आवश्यक आहे. एकूणच शहरातील नागरिक, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजना यशस्वीपणे राबविण्यावर आपला भर राहणार आहे. पालघर आणि अमरावती शहराचा अनुभव आपल्या पाठीशी असून शहराच्या विकासाकरिता लोकांकडून अभिप्रायांची अपेक्षा आहे. सामान्य जनता, प्रशासनासोबत काम करतानाच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार काम करण्याची भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले....तर वाद होणार नाहीनागरिकांची सेवा करणे हाच प्रामाणिक उद्देश असेल तर वाद होणार नाही, असेही मनपा आयुक्त अभिजित बांगर म्हणाले. महापालिकेतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचे तास वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले. सर्वच ठिकाणी मनुष्यबळाची समस्या आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :commissionerआयुक्तAbhijit Bangarअभिजित बांगर