शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वच्छतेला प्राधान्य द्या : संजय धिवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:09 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देप्रशासनाने घेतला पूर्वतयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, चिन्मय पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, एन.आर.सुुटे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे ७ लाखांपर्यंत अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व साफसफाई, २४ तास वीजपुरवठा, बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपायुक्त संजय धिवरे यांनी दिले.‘दीक्षाभूमी’ येथे दिनांक ५ ते ९ऑक्टोबर दरम्यान अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्त धिवरे यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्यावतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जास्तीत जास्त फिरते शौचालयाची व्यवस्था करावी. अंबाझरी तलाव या प्रेक्षणीयस्थळी यात्रेकरु मोठ्या प्रमाणावर येतात. अंबाझरी तलाव भरलेला असल्यामुळे या परिसरात लाईफ गार्डसची बोटीसह व्यवस्था करण्यात यावी. विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकरिता जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच गर्दीच्या वेळी मोबाईल नेटवर्क योग्यरीतीने काम करीत नसल्याने पोलिसांसाठी वायरलेस यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी.आरोग्य विभागाने आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच मुख्य मैदानात विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी. पोलीस विभागाने पोलीस नियंत्रण व सहाय्यता कक्ष मोबाईल झोन तयार ठेवावे. भाविकांना अन्नदान वाटपामुळे काहीही अनुचित घटना घडू नये, याबाबत संबधित विभागाने विशेष काळजी घ्यावी. आकस्मिक पाऊस, वादळ आल्यास भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुसज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी दिली.दीक्षाभूमी येथे वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात ८ ऑक्टोबर रोजी असला तरी अनुयायांची गर्दी ५ ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी