शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वच्छतेला प्राधान्य द्या : संजय धिवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:09 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देप्रशासनाने घेतला पूर्वतयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे आज ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, चिन्मय पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, एन.आर.सुुटे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे ७ लाखांपर्यंत अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व साफसफाई, २४ तास वीजपुरवठा, बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश उपायुक्त संजय धिवरे यांनी दिले.‘दीक्षाभूमी’ येथे दिनांक ५ ते ९ऑक्टोबर दरम्यान अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. या दरम्यान तसेच कार्यक्रम समाप्तीनंतर परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपायुक्त धिवरे यांनी दिल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्यावतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जास्तीत जास्त फिरते शौचालयाची व्यवस्था करावी. अंबाझरी तलाव या प्रेक्षणीयस्थळी यात्रेकरु मोठ्या प्रमाणावर येतात. अंबाझरी तलाव भरलेला असल्यामुळे या परिसरात लाईफ गार्डसची बोटीसह व्यवस्था करण्यात यावी. विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकरिता जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी. तसेच गर्दीच्या वेळी मोबाईल नेटवर्क योग्यरीतीने काम करीत नसल्याने पोलिसांसाठी वायरलेस यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी.आरोग्य विभागाने आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका तसेच मुख्य मैदानात विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी. पोलीस विभागाने पोलीस नियंत्रण व सहाय्यता कक्ष मोबाईल झोन तयार ठेवावे. भाविकांना अन्नदान वाटपामुळे काहीही अनुचित घटना घडू नये, याबाबत संबधित विभागाने विशेष काळजी घ्यावी. आकस्मिक पाऊस, वादळ आल्यास भाविकांची गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुसज्ज राहावे, अशी सूचना त्यांनी दिली.दीक्षाभूमी येथे वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा एकदिवसीय अर्थात ८ ऑक्टोबर रोजी असला तरी अनुयायांची गर्दी ५ ऑक्टोबरपासून वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळात परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करु द्याव्यात, असे डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी