शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पंतप्रधानांचा भर जनतेच्या मनोधैर्यावर तर मुख्यमंत्र्यांचा आराखड्यावर; ‘कोरोना’काळातील अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:20 IST

‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. या दोन्ही नेत्यांच्या संबोधनांच्या तुलनात्मक विश्लेषणावर अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रोफेसर डॉ. धर्मेश धवनकर यांच्या नेतृत्वात वरील अध्ययन करण्यात आले. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दोन्ही नेत्यांनी केलेल्या संबोधनावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करण्यात आले.अध्ययनातील निष्कर्षानुसार ‘लॉकडाऊन’संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात ‘लॉकडाऊन’चे नियोजन व राज्य सरकारची धोरणे यांची माहिती देण्यावर भर होता. या अध्ययनात निधी वैरागडे व तेजस अंजनकर यांनी सहकार्य केले.अध्ययनातील महत्त्वाच्या बाबीदोन्ही नेत्यांनी ‘लॉकडाऊन’च्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला नाही.दोघांनीही ‘फेक न्यूज’वर बोलण्याचे टाळलेपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.पंतप्रधानांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला. जसे की ९ कुटुंबांना २१ दिवसासाठी मदत करण्याचा संकल्प.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते. ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’सारखे आवाहनपंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षमुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस