शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पंतप्रधानांचा भर जनतेच्या मनोधैर्यावर तर मुख्यमंत्र्यांचा आराखड्यावर; ‘कोरोना’काळातील अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:20 IST

‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. या दोन्ही नेत्यांच्या संबोधनांच्या तुलनात्मक विश्लेषणावर अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रोफेसर डॉ. धर्मेश धवनकर यांच्या नेतृत्वात वरील अध्ययन करण्यात आले. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दोन्ही नेत्यांनी केलेल्या संबोधनावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करण्यात आले.अध्ययनातील निष्कर्षानुसार ‘लॉकडाऊन’संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात ‘लॉकडाऊन’चे नियोजन व राज्य सरकारची धोरणे यांची माहिती देण्यावर भर होता. या अध्ययनात निधी वैरागडे व तेजस अंजनकर यांनी सहकार्य केले.अध्ययनातील महत्त्वाच्या बाबीदोन्ही नेत्यांनी ‘लॉकडाऊन’च्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला नाही.दोघांनीही ‘फेक न्यूज’वर बोलण्याचे टाळलेपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.पंतप्रधानांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला. जसे की ९ कुटुंबांना २१ दिवसासाठी मदत करण्याचा संकल्प.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते. ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’सारखे आवाहनपंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षमुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस