शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

पंतप्रधानांचा भर जनतेच्या मनोधैर्यावर तर मुख्यमंत्र्यांचा आराखड्यावर; ‘कोरोना’काळातील अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:20 IST

‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. या दोन्ही नेत्यांच्या संबोधनांच्या तुलनात्मक विश्लेषणावर अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील प्रोफेसर डॉ. धर्मेश धवनकर यांच्या नेतृत्वात वरील अध्ययन करण्यात आले. १८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत दोन्ही नेत्यांनी केलेल्या संबोधनावर सर्वेक्षणाच्या माध्यमातून अध्ययन करण्यात आले.अध्ययनातील निष्कर्षानुसार ‘लॉकडाऊन’संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सखोल माहिती दिली. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात ‘लॉकडाऊन’चे नियोजन व राज्य सरकारची धोरणे यांची माहिती देण्यावर भर होता. या अध्ययनात निधी वैरागडे व तेजस अंजनकर यांनी सहकार्य केले.अध्ययनातील महत्त्वाच्या बाबीदोन्ही नेत्यांनी ‘लॉकडाऊन’च्या आर्थिक परिणामांवर प्रकाश टाकला नाही.दोघांनीही ‘फेक न्यूज’वर बोलण्याचे टाळलेपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.पंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.पंतप्रधानांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षपंतप्रधानांनी प्रशासकीय बाजूपेक्षा सामाजिक कल्याणाच्या बाजूवर जास्त भर दिला. जसे की ९ कुटुंबांना २१ दिवसासाठी मदत करण्याचा संकल्प.पंतप्रधानांच्या संबोधनातील आवाहने केवळ ‘लॉकडाऊन’ किंवा संकटकाळापुरते मर्यादित नव्हते. ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’सारखे आवाहनपंतप्रधानांनी केलेल्या घोषणा या व्यापक स्वरूपाच्या होत्या.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाच्या अध्ययनातीन निष्कर्षमुख्यमंत्र्यांच्या संबोधनात नागरिकांकडून विशिष्ट कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातून नागरिकांनी संयम पाळावा व विश्वास ठेवावा हे आवाहन.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या नेमक्या व ठराविक आराखड्यातील होत्या.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस